शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 28, 2015 00:21 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ; आठ महिन्यांत १0५ आत्महत्या.

बुलडाणा : शेतकरी आत्महत्येचे सत्र बुलडाणा जिल्ह्यात सुरूचआहे. गत आठ महिन्यात जिल्ह्यात १0५ शे तकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत १0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील दहा वर्षांमध्ये १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आ त्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पात्र प्रकरणांपेक्षा अपात्र प्रकरणांचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळू शकला नाही. जिल्ह्यात सन १ जानेवारी ते २७ ऑगस्ट दरम्यान, नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १0५ शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता, कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली, तर १९ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात िपकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू असून, २५, २६ आणि २७ ऑगस्ट या तीन दिवसांत पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. *यावर्षी १९ प्रकरणे ठरविली अपात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सन २00५ पासून सुरू झाले. यादरम्यान १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या काळात जिल्ह्यात १0५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यापैकी शासनाने विविध निकष लावून १९ प्रकरणे अपात्र ठरविली. यात आजारपणामुळे दोन, व्यसनाधीनता सहा, अपघात दोन, बेरोजगारी एक आणि घरगुती भांडणातून नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.