शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

By admin | Updated: October 10, 2016 00:55 IST

गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत.

सहा महिने मुदत : अभय योजनेंतर्गत ग्राहकांना मिळणार वीज बिलात सूट
गडचिरोली : गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत. या ग्राहकांकडून वीज बिलाचे पैसे काढण्यासाठी आता वीज विभागाने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बिल थकीत ठेवलेल्या ग्राहकांना काही सूट दिली जाणार आहे. सदर अभय योजना १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातही प्रत्येक महिन्याला वीज बिल पाठविले जाते. सदर वीज बिल प्रत्येक महिन्याला भरणे अपेक्षित असले तरी काही वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नाही. एक महिना वीज बिल न भरल्यास वीज कंपनी कोणतीही कारवाई करीत नसली तरी दोन महिन्याचे वीज बिल न भरल्यास संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवून वीज बिल भरण्यात यावे, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला जातो. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेले ग्राहक वीज बिल भरत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेले गडचिरोली मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागातील १४ हजार ६८८ ग्राहकांकडे ४ कोटी रूपयांची रक्कम थकीत आहे. ब्रह्मपुरी विभागातील ८ हजार ५२४ ग्राहकांकडे १ कोटी ८६ लाख व गडचिरोली विभागातील १५ हजार ८४१ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रूपये थकले आहेत, असे एकूण गडचिरोली वीज मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहकांकडे १० कोटी २० लाख रूपये थकले आहेत.
चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत गडचिरोली मंडळ येते. चंद्रपूर परिमंडळातील ७४ हजार ५१५ ग्राहकांकडे २४ कोटी ५ लाख रूपये थकले आहेत. १ हजार ७४९ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख, १४ कुकुटपालन व्यावसायिकांकडे २ लाख ३२ हजार, ९२० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ४५ लाख ९ हजार, ६३ हजार ८३० ग्राहकांकडे १७ कोटी ४३ लाख, ७१ ग्रामपंचायतींकडे ७ लाख ७१ हजार रूपये थकले आहेत. अभय योजनेंतर्गत या सर्व ग्राहकांना २ कोटी ६३ लाख रूपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज विभागाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

अभय योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरण कंपनीने २०१६-१७ या वर्षासाठी अभय योजना सुरू केली आहे. सदर योजना १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदरांना ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम माफ होणार आहे. पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. पुढील तीन महिने ते सहा महिन्यापर्यंत मूळ थकबाकी भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. अभय योजनेच्या पहिल्याच महिन्यात ज्या थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीतील ५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. थकबाकीतून मुक्त झालेल्यांना त्वरित नवीन वीज जोडणी दिली जाणार आहे. सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चॉर्जेस, रिकनेक्शन चॉर्जमधून सूट दिली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी ग्राहकाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना किती रक्कम भरायची आहे, याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. न्याय प्रविष्ठ असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातीलही ग्राहकांना अभय योजनेत सहभागी केले जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन परवानगी प्रक्रिया व त्याचा खर्च थकबाकीदारांना करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.