शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार?

By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST

आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी

उसर्रा : आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, टाकला, सिहरी, ताडगाव, धोप, मालदा, सालई बु., विहिरीगाव, बपेरा, आंबागड आदी भागात धानाचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला अल्प पाऊस असल्याने काहींनी पऱ्हे सुद्धा टाकले नाही. तर ज्यांच्याकडे पाण्याचे साधन आहे अशांनी धानपिकाची लागवड केली. काहींनी निसर्गावर अवलंबून धान पिकाची लागवड केली. एक दोन पाऊस खूप जोरदार पडले. तेव्हा शेतकऱ्यांना आशा पल्लवीत झाल्या. नंतर पावसाने दडी मारली तेव्हा बावनथडी धरणातून पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पोहचविणे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना जमले नाही. याचे कारण म्हणजे पादचाऱ्याचे काम अद्यापही न झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही.यातच धान पिकाला मावा, तुडतुडा, खोडकिडासारख्या रोगांची लागण झाली. यात धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना एका पाण्याची आवश्यकता आहे. ज़्यांच्याकडे पाण्याची सुविधा जसे विहिर, बोअरवेल आहेत. परंतु सध्या परिसरात जास्तीचे भारनियमन सुरु असून अल्पवेळेत शेतकऱ्यांना वीज पुरवावी लागते. त्यामुळे शेतकरी वेळेवर शेतात पाणी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी धानपिकासाठी बँका, वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले. कर्जासाठी बँकेचे पदाधिकारी तगादा लावत आहेत. पण पिकच होणार नाही तर कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही दिवसाअगोदर परिसरात रानडुकरांनी हैदोस घालून धानपिके नष्ट झाली होती हे विशेष. या सर्व कारणाने बळीराजा दूरावला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही. (वार्ताहर)