शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कृषी वीज बिलाच्या वसुलीकरिता शेतकऱ्यांना विविध सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने ...

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने बिल भरण्याचे टाळले. त्यामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण आपोआपच वाढत गेले. थकीत वीज बिलाची पालांदूर केंद्रांतर्गत थकीत शेतकरी १७११ ची रक्कम ६.३७ कोटी एवढी वाढलेली आहे. या रकमेची वसुली व्हावी याकरिता कृषी विभागाने वीज बिलात माहे सप्टेंबर २०२० च्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ करण्याचे जाहीर केले आहे. तसेच माहे सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार पूर्णपणे अर्थात १०० टक्के माफ, माहे सप्टेंबर २०१५ पूर्वी पर्यंत थकीत बाकीवरील व्याज पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणीचे नियोजन; परंतु वीज बिलात सवलत मिळविण्याकरिता चालू वीज बिल भरणे बंधनकारक राहील. तसेच या योजनेंतर्गत रोहित्र अर्थात डीपी स्तरावर सर्व कृषी ग्राहकांनी १०० टक्के चालू वीज बिल व थकबाकी भरल्यास कृषी पंपाच्या चालू वीज बिलावर शेतकऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात येईल, असे शेतकरी बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीला कार्यकारी अभियंता कुमार, अभियंता टेकाम, उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे, तंत्रज्ञ हिरामण बारई, उपसरपंच हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.

चौकट डब्बा

शेतकऱ्यांना मागणीनुसार तत्परतेने नवीन वीज कंनेक्शन पुरविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. ३० मीटरपर्यंतचे अंतरावर शेतकऱ्याला ३० दिवसांच्या आत सर्व्हिस केबलने कनेक्शन मिळेल. २०० मीटरपर्यंत त्यानंतर आला तीन महिन्यात एबी केबलद्वारे कनेक्शन देण्यात येईल. ६०० मीटरपर्यंतचे अंतराला प्रतीक्षा यादीप्रमाणे एचव्हीडीएसद्वारे कनेक्शन पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर ऊर्जेवरील सेवा शेतकऱ्यांना पुरवित सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यात येईल.

उत्पन्न वाढीकरिता ग्रामपंचायतला संधी

महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याकरिता महावितरणच्या वीज बिल वसुलीचा आधार घेतले जाणार आहे. ग्रामपंचायतने शेतकऱ्याचे कृषी वीज बिल कार्यालयात जमा केल्यास प्रति बिलाला ५ रुपयांचा कमिशन ग्रामपंचायतला मिळेल. तसेच शेतकऱ्याकडून थकीत वीज बिलाची वसुली केल्यास थकीत वीज बिलाच्या २० टक्के रक्कम ग्रामपंचायतला मिळेल. यातून निश्चितच ग्रामपंचायतच्या उत्पन्नात भर पडून गाव विकासाकरिता नवी संधी शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून राबविलेली आहे.