शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारव्हा, चिचाळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील किन्ही/ गुंजेपार येथील शेत शिवारात वीज पडून तब्बल १५ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याच दिवशी बारव्हा-चिचाळ परिसरात वादळाच्या तडाख्याने व पावसाने जवळपास चार ते पाच घरावरील कौलारू व टीन पत्र्यांची छते पूर्णत: उडून गेली.

ठळक मुद्देघरांचे नुकसान : धानालाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे बारव्हा-चिचाळ परिसरातील घरांचेछत उडाले. उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आपदग्रस्तांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील किन्ही/ गुंजेपार येथील शेत शिवारात वीज पडून तब्बल १५ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याच दिवशी बारव्हा-चिचाळ परिसरात वादळाच्या तडाख्याने व पावसाने जवळपास चार ते पाच घरावरील कौलारू व टीन पत्र्यांची छते पूर्णत: उडून गेली. अनेक कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीखालील कापणी योग्य उन्हाळी धान पावसाने साचलेल्या शेतात पडल्याने धानाची लोंबी नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
लाकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कुटुंब पोषणाचा मोठा पेच उभा ठाकला असताना अचानक झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे व शेतीचे झालेल्या हानीमुळे येथील नागरिक अधिकच संकटात सापडले आहेत.
दरम्यान, वादळी पावसाच्या तडाख्यात घराचे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना मध्ये संजय रंगारी चिचाळ, वसंता झोडे बारव्हा व अन्य काही जणांचा समावेश आहे तर उन्हाळी धान पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांमध्ये पुष्पा नीलकंठ लोंढे, धनराज रुईकर, रामचंद्र तरवरे, धनंजय लोंढे यासह परिसरातील बहुसंख्य शेतकºयांच्या शेतातील उन्हाळी धान पिकाची हानी झाली आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने आपदग्रस्त भागाची पाहणी व चौकशी करून पीडितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी बालू चुन्ने सह आपदग्रस्तांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस