शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गळती बस दाखवा... एक हजार रूपये मिळवा

By admin | Updated: July 24, 2014 23:42 IST

प्रवाशांना अविरतपणे सेवा देणाऱ्या एस.टी. बसेस तांत्रिक अडचणीमुळे खिळखिळ्या झाल्या आहेत. यातील काही बसेस पावसाळ्यात गळतात. त्यामुळे प्रवाशांची ओरड असल्यामुळे त्यात सुधारणा व्हावी,

परिवहन मंडळाचा अनोखा उपक्रम : प्रवाशांना दर्जेदार सेवेची ग्वाहीप्रशांत देसाई - भंडाराप्रवाशांना अविरतपणे सेवा देणाऱ्या एस.टी. बसेस तांत्रिक अडचणीमुळे खिळखिळ्या झाल्या आहेत. यातील काही बसेस पावसाळ्यात गळतात. त्यामुळे प्रवाशांची ओरड असल्यामुळे त्यात सुधारणा व्हावी, याकरीता राज्य परिवहन मंडळ सरसावले आहे. आता प्रवाशांना योग्य प्रमाणात बसेस उपलब्ध असल्या तरी गळतीच्या बसेस असल्यास ते दाखवा व मोबदल्यात एक हजार रूपयाचे बक्षिस मिळवा, असे परिपत्रक अलिकडेच निर्गमित झाले आहेत. मागील ७५ वर्षांपासून राज्य परिवहन मंडळाचा ‘गाव तिथे एस.टी.’ हा उपक्रम सुरू आहे. महामंडळाच्या या बसेसने राज्यात तसेच आंतरराज्यात प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रयत्न केले जातात. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून प्रवाशाच्या सेवेसाठी चांगले वाहन देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी परिवहन मंडळ वाहनांचे यांत्रिक स्थिती चांगली असण्याबरोबरच वाहनांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.पावसाळ्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्रापत व्हायच्या. त्याबाबत या तक्रारी न येण्यासाठी एस.टी. गळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एस.टी. न गळण्यासाठी करावयाच्या कामा संबंधीच्या सुचना यंत्र अभियांत्रिकी खात्यामार्फत प्रसारीत करून वाहनाची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. या सुचनांची अंमलबजावणी झाल्यास गाड्यांची गळतीची तक्रारी राहणार नाही व त्यामुळे राज्य परिवहन मंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी मदत होईल. यादृष्टीकोनातून राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी औरंगाबाद, नागपूर व पुणे येथील कार्यशाळांना व आगारप्रमुख व विभागप्रमुखांना परिपत्रक पाठवून बसमधील गळतीचे प्रमाण थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत.या सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे व बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही पद्धतीचा त्रास किंवा पावसाचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने सर्वांना निर्देश देण्यात आले आहे, त्याची अंमलबजाणी करण्यात आली आहे. आजही अनेक एस.टी. आगारात जुन्या बसेस असल्यामुळे त्यांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद झाली नसल्यामुळे याची अंमलबजावणी करण्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ कितपत यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.