शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

ढगाळ वातावरणाने रबी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो.

ठळक मुद्देटेंशन वाढले : भाजीपाला पिकांवरही सक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाळी धानासह अन्य रबी पिकांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांवरही संक्रांत आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादनात अळीचे निर्माण होत असल्याने त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होत असतो. याचा सर्वाधिक प्रादूर्भाव तूर पिकावर दिसून आला. आठ दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर पुन्हा उन्ह तापल्याने मिळेल त्या मार्गाने शेतकऱ्यांनी ओला झालेला धान वाळवायला सुरुवात केली होती. मात्र मंगळवारपासून बारदाना संपल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली. त्यातच वाळलेला धानही पावसामुळे ओला झाल्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला.पाखर झालेला धान केंद्रात घ्यायला तयार नसल्याने दाद कुणाकडे मागायची अशी स्थिती बळीराजापुढे निर्माण झाली. यापूर्वी धानाचे हमीभाव वाळल्यानंतरही जुन्याच दराने धानाची खरेदी सुरु होती. मात्र या संदर्भात आवाज उठविल्यानंतर नवीन दराने धानाची विक्री होऊ लागली. मात्र बारदानाच नसल्याने ती खरेदीही ठप्प झाली. दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने बळीराजाचे टेंशन वाढविले असून भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचेही प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती