शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:47 IST

मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : शेतातील कामे अर्धवटच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात रोवणीची कामे अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.यंदा पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे पेरणीची कामे उशीरा झाली. पेरणीनुसार रोवणीची कामे जुलै अखेर संपणे अपेक्षित होते. परंतु आॅगस्ट महिना सुरू होऊनही रोवणीची कामे आटोपली नाहीत. अनेक शेतकºयांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी सर्व पिकांच्या पेरणी करीत भात रोवणीसाठी पºहे सुद्धा टाकले होते. त्यानुसार नर्सरीला एक ते सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सामान्यत: २० ते २५ दिवसांची नर्सरी रोवणीसाठी उत्तम मानली जाते. उशीरा रोवणी केल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. सध्या वरथेंबी पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतात पाणी नसल्याने शेतकºयांनी रोवणीची कामे अर्ध्यावर आहेत.जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पीक समाधानकारक दिसत आहे. परंतु ज्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी पूर्ण केली, ते पºहे मरत आहेत. रोपवाटिका वाळत असल्याचे चित्र आहे.उत्पादन होणार निम्म्यापेक्षा कमी१५ आॅगस्टपर्यंत हलक्या धानाची मुदत असते. मात्र १५ आॅगस्टनंतर केलेल्या रोवणीचा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे पुढे पाऊस आला तरी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी येईल, अशी शंका शेतकºयांंनी व्यक्त केली आहे. धान शेतात लावून अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पण पावसाचा पत्ताच नाहीत. जो दिवस उगवतो तो सारखाच असतो. त्यामुळे या वेळी शेतकºयांचे बेहाल होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.नदी-नाले कोरडेचपावसाळा कोरडाच जात आहे. पावसाचे तीन ते चार नक्षत्र लोटूनही मुंडीकोटा परिसरात नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पंप धारकांनी पावसाची वाट न बघता पºहे लावले व रोवणीलाही सुरुवात केली. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेला शेतकरी पावसाची वाट पहात आहे. अनेक शेतकºयांचे लावलेले बियाणे वाया गेले. दुसरीकडे पंपधारकांनी जोमात पेरणीला सुरुवात केली. मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने विहीर, बोअरवेल, नदी, नाले कोरडे आहेत. कशीतरी पेरणी केली, परंतु रोवणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी निराश होत आहे. मात्र पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र चिंतेमध्ये आहेत. या परिसरात बहुतांश रोवण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या पºहांना ४० ते ५० दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ते रोवण्यायोग्य नाही. रोपे वाळत चालले असून जमिनीला भेगा पडत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.