शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देदिल्ली-भंडारा रेल्वे प्रवास : सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मरकज काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या शहरातील ११ व्यक्तींना संशयावरून शुक्रवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. आता जिल्ह्यातील दोन जण मरकजमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना गुरूवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रशासनाकडून शोध सुरू असताना शुक्रवारी संशयावरून ११ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. मात्र चौकशीत ते मरकजमध्ये सहभागी झाल्याचे आढळून आले नाही. ९ मार्च रोजी सात जण संपर्कक्रांती एक्सप्रेसने दिल्लीहून नागपूरला पोहचले. तेथून १२ मार्चला भंडारा येथे दाखल झाले. त्यांच्याकडील रेल्वे प्रवासाच्या तिकीटही उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरित चार जण १५ मार्च रोजी गोंडवाना एक्प्रेसने जनरल डब्यातून प्रवास करत १६ मार्चला भंडारा येथे पोहचले होते. या सर्वांना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना केल्या जात असून हॉस्पिटल क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केले जात आहे. विलगीकरण कक्षात आता ३४ जणांना दाखल करण्यात आले असून तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे.

१२ हजारावर व्यक्ती होम क्वारंटाईन
जिल्ह्यातील १० व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील दहा व्यक्तींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.

मुंबई-पुण्यासह महानगरातून जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १२ हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यांची रॅपिड रिस्पॉन्स टीमने भेट घेवून सूचना दिल्या. या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तर परदेशातून आलेल्या २२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वाेतोपरी उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर प्रत्येकाची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या