शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देदिल्ली-भंडारा रेल्वे प्रवास : सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मरकज काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या शहरातील ११ व्यक्तींना संशयावरून शुक्रवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. आता जिल्ह्यातील दोन जण मरकजमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना गुरूवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रशासनाकडून शोध सुरू असताना शुक्रवारी संशयावरून ११ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. मात्र चौकशीत ते मरकजमध्ये सहभागी झाल्याचे आढळून आले नाही. ९ मार्च रोजी सात जण संपर्कक्रांती एक्सप्रेसने दिल्लीहून नागपूरला पोहचले. तेथून १२ मार्चला भंडारा येथे दाखल झाले. त्यांच्याकडील रेल्वे प्रवासाच्या तिकीटही उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरित चार जण १५ मार्च रोजी गोंडवाना एक्प्रेसने जनरल डब्यातून प्रवास करत १६ मार्चला भंडारा येथे पोहचले होते. या सर्वांना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना केल्या जात असून हॉस्पिटल क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केले जात आहे. विलगीकरण कक्षात आता ३४ जणांना दाखल करण्यात आले असून तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे.१२ हजारावर व्यक्ती होम क्वारंटाईनजिल्ह्यातील १० व्यक्ती आयसोलेशन वॉर्डातकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील दहा व्यक्तींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.मुंबई-पुण्यासह महानगरातून जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १२ हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यांची रॅपिड रिस्पॉन्स टीमने भेट घेवून सूचना दिल्या. या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तर परदेशातून आलेल्या २२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वाेतोपरी उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर प्रत्येकाची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या