शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

संगम येथे विजेचा लपंडाव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

फोटो ०९ लोक०२,०३ के भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा ...

फोटो ०९ लोक०२,०३ के

भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता, कर्मचारी नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी संपर्क झालाच तर दुसऱ्याही गावाची वीज खंडित आहे. तुमचे एकच गाव आहे का? वाट पहा! अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

भंडारा शहरालगत संगम पुनर्वसन हे गोसे प्रकल्पबाधित गाव आहे. येथील विद्युत यंत्रणा पूर्णतः खिळखिळी झाली असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले असून, जिवंत तारा लोंबकळत आहेत, याशिवाय विद्युत रोहित्रही खुले असून, पूर्णतः फुटलेले आहे. त्यामुळे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने विजेच्या ठिणग्या पडून गावातील वीजपुरवठा रोजच खंडित होत असून, ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

जनमित्राला संपर्क केल्यास ते नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी-कधी थातुरमातूर जोड जंतर करतात. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, गावातील वीजपुरवठा सुरळीत करून फुटलेले रोहित्र तसेच लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांबांची पुनर्बांधणी करून बंद असलेले पथदिवे सुरु करण्याबाबत कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, या निवेदनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. अशातच ८ मे रोजी ५.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संगम येथील अगोदरच खिळखिळी असलेली विद्युत यंत्रणा यामुळे कोसळली असून, जिवंत विद्युत तारा व विजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा शनिवारपासून अद्यापपर्यंत बंद आहे. जनमित्रांशी संपर्क केला असता. नेहमीप्रमाणे ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

एकीकडे कोरोना महामारीने नागरिकांचे जगणे मुश्कील केले तर दुसरीकडे भरमसाठ येणाऱ्या विद्युत बिलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच हाताला काम नसल्याने अनेकांचे रोजगार गेले असून, हातावर पोट असणाऱ्यांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संगम येथील ग्रामस्थ विजेच्या रोजच्या त्रासाला कंटाळले असून, जिवंत विद्युत तारा, वाकलेले खांब व फुटलेल्या रोहित्रामुळे गावात जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रतिक्रिया:-

शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मंडलामधील बहुतांश गावांमधील विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

चापेकर, कनिष्ठ अभियंता, शहापूर मंडल.