शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अडयाळमधील अंगणवाड्यांमधील विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:35 AM

विशाल रणदिवे अडयाळ : विद्युत उपकेंद्र, अडयाळअंतर्गत एकूण ४२ गावे येतात आणि त्यात फक्त एक वर्ष अधिक थकबाकी असणाऱ्या ...

विशाल रणदिवे

अडयाळ : विद्युत उपकेंद्र, अडयाळअंतर्गत एकूण ४२ गावे येतात आणि त्यात फक्त एक वर्ष अधिक थकबाकी असणाऱ्या अडयाळ गावातील सर्व तब्बल १० अंगणवाडीमधील १३ ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान विद्युत विभागाने विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहिती आहे. गेल्या १३ महिन्यांचे १० अंगणवाड्यांचे एकूण विद्युत बिल ४१,२०० असल्याची माहिती आहे. या सर्व अंगणवाड्यांच्या विद्युत बिलांचा भरणा अडयाळ ग्रामपंचायत नियमितपणे सामान्य फंडातून भरत असली तरी, एकूण १३ महिन्यांचे विद्युत बिल असल्याने जेव्हा विद्युत पुरवठा खंडित करणार होते, तेव्हा सरपंच जयश्री कुंभलकर यांनी मार्चपर्यंत बिल भरणार असल्याचे बोलले होते, अशी माहिती आहे.

अडयाळ येथील दहा अंगणवाड्यांचे वीजबिल गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत अडयाळ नियमितपणे भरत होती. महत्त्वाचे म्हणजे याचे बिलसुध्दा ग्रामपंचायत अडयाळ येथे येत असल्याची माहिती आहे. पण एक वर्षाच्यावर ज्यांची विद्युत बिले थकित आहेत, अशांची वीज जोडणी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कापण्यात आल्याची माहिती यावेळी विद्युत उपकेंद्र, अडयाळ येथील सहायक अभियंता अनुराग गजभिये यांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मागीलवर्षीच्या जुलै २०२० पर्यंत एकत्र येऊन मिटिंग घेणे बंद होते; पण ऑगस्टपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मिटिंग दर महिन्याला दोनदा अंगणवाडी क्रमांक ८, तर कधी ९ मध्ये घेण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सी. बी. ई. उपक्रमसुध्दा राबविण्यात येत आहे. त्यात गरोदर व स्तनदा मातांना तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे तसेच महिन्यातून दोनदा सुपोषण व अन्न प्राशन दिनाचे आयोजन करणे, मुलांचे वजन घेणे, आहार वाटप, मुलांचे ग्रेडेशन काढणे तसेच रेकॉर्ड मेंटेनन्स करणे आदी कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस आजही करताना दिसतात.

अशावेळी जर विद्युत पुरवठा खंडित होत असेल, तर त्यात दोष कुणाचा? एकीकडे विद्युत बिल अवाच्या सव्वा आल्याने आजही अनेकांनी आपले विद्युत बिल भरले नाही, तर दुसरीकडे विद्युत ग्राहकांनी विद्युत बिल भरलेच नाही म्हणून विद्युत विभाग विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.

अंगणवाडीमध्ये आजही लहानसहान बालके येऊन बसत नसली, तरी विविध प्रकारच्यानिमित्ताने त्यांना व मातांना यावे लागते आणि आता तर उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चालली आहे. याकरिता संबंधित अधिकारी तथा कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी यावेळी अडयाळ ग्रामवासीयांनी केली आहे.