शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाजाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST

भटक्या विमुक्त समाजातील पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी, राज्य शासनाने अर्थसंकल्पात पुनर्वसनासाठी ४८ कोटींची तरतूद केलेली आहे.

भंडारा : भटक्या विमुक्त समाजातील पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी, राज्य शासनाने अर्थसंकल्पात पुनर्वसनासाठी ४८ कोटींची तरतूद केलेली आहे. ती मिळावी आदी मागण्यांसाठी पारधी समाजबांधवांनी आज जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील गिरोला येथील शासकीय खुल्या जागेवर भटक्या विमुक्त जातीमधील वडार समाजातील २९ कुटुंबांचे सात वर्षापासून वास्तव्य आहे. कारधा येथे मांग, गारुडी समाजाच्या लोकांचे अनेक वर्षापासून वास्तव्य आहे. सामान्य रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत कोतारी समाजातील लोकांचे १३ वर्षापासून वास्तव्य आहे. यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भटक्या विमुक्त समाज बांधव वास्तव्य करीत असून उदरनिर्वाहासाठी प्लास्टीकची भांडी विकणे,केसांवर भांडी विकणे, जाते पाटे बनवून विकणे, मोलमजूरी करुन उपजिवीका भागवित आहे.या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने हा समाज इतर समाजाच्या तुलनेत मागे आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी ४८ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र हा पैसा त्यांच्या पुनर्वसनावर खर्च करण्यात आला नाही.मागील अनेक वर्षापासून हा समाज जिल्ह्यात राहत असतानाही त्यांना राशन कार्ड, मतदान ओळखपत्र व शासकीय योजनांचा अजूनही लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना या सुविधांचा लाभ मिळावा व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेखाली त्यांचे पुनर्वसन करावे, जातीचे दाखले, राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आर्थिक विकास महामंडळाचा लाभ आदींचा लाभ द्यावा या मागणींसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)