शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आता रोवणीही होणार यंत्राच्या मदतीने

By admin | Updated: July 21, 2014 00:01 IST

आता रोवणी करण्याचे काम यंत्राच्या मदतीने होत असल्याने शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर गोळा करण्याची धडपड थांबणार आहे. जिल्ह्यात रोवणी यंत्राने रोवणी करण्याचे प्रात्यक्षिक कृषी

मोहाडी : आता रोवणी करण्याचे काम यंत्राच्या मदतीने होत असल्याने शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर गोळा करण्याची धडपड थांबणार आहे. जिल्ह्यात रोवणी यंत्राने रोवणी करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाने पिंपळगाव येथे केले.भात रोवणी यंत्राच्या सहाय्याने पिंपळगाव झंझाड येथे जिल्ह्यात प्रथम प्रयोग करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुदळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, कृषी विकास अधिकारी किरवे, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी भट, झलके, सार्वे, गणेश शेंडे तसेच तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते. यंत्राने भात रोवणीचा प्रयोग विष्णू आतीलकर यांच्या शेतात करण्यात आला.ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिराटा, चिखलणी, पेरणी, मळणी आदी कामे शेतकरी झटपट करू लागले. यामुळे मनुष्यबळ व वेळ बचतीचा लाभ व्हायला लागला. आता रोवणी करणारे यंत्राने रोवणी होवू लागल्याने शेतकऱ्यांना रोवणीसाठी महिला मजूर गोळा करण्याची मेहनत कमी झाले आही. कृषी विभागाकडून भात रोवणीचे यंत्र अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी भाताची रोवणी करण्यासाठी पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक व यंत्राच्या मदतीने रोवणी करणे सहज, सोपे झाले आहे. रोवणीसाठी मजुरांसाठी गाव, शेजारील परिसरात शेतकऱ्यांना फिरावे लागते. त्या मजुरांना शेतापर्यंत ने आण करण्याची सोयही शेतकरी करतात. मजुरांअभावी भात रोवणी उशिरा होत असल्याची ओरड ऐकायला यायची. आता मात्र भातपिकाची रोवणी करण्यासाठी यंत्र आल्याने मनुष्यबळाची व वेळेची बचत अधिक होणार आहे. भात रोवणी यंत्राचे सहाय्याने रोवणी केल्यास मजुरांची संख्या पाच ते सहा लागते. रोपवाटिकेसाठी पारंपारिक पद्धतीपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी जागा लागते. जिथे ३० कि.ग्रॅ. लागते येथे नव्या पद्धतीत १५ ते २० कि.ग्रॅ. बियाणेची आवश्यकता असते. रोवणीसाठी १६ ते १८ दिवसांची रोपे वापरता येऊ शकते. दोन रोपांमधील व दोन ओळींमधील अंतर एकसमान ठेवता येते. कुटुंबातील व्यक्तींकडून देखील रोवणी करता येवू शकते. रोवणी यंत्राने मानवी कष्ट कमी लागते. पारंपरिक रोवणी पद्धतीत रोवणीचा खर्च प्रती एकरी २५०० रु. लागतो. यंत्राच्या सहाय्याने रोवणी केल्यास रोवणीचा खर्च ५०० रु. पेक्षा कमी येतो. अने १५ ते २० टक्के उत्पादनही जास्त येण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)