शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ बंद, रस्त्यांवर बिनकामाची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ५ एप्रिल राेजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश निर्गमित केला. या आदेशानुसार साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लाेकांना एकत्र येण्यास बंदी अर्थात जमावबंदी आदेश लागू केला आहे, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घाेषित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजमावबंदीचा फज्जा : चाैकाचाैकांत नागरिकांचे जत्थेच्या जत्थे, कुणाचेही नियंत्रण नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह शहरात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, दरराेज हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी घाेषित केली आहे. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद असताना रस्त्यांवर मात्र नागरिकांची दरराेज गर्दी हाेत आहे. शहरातील विविध ठिकाणी ही गर्दी दिसत असून, प्रशासनाच्या जमावबंदी आदेशाचा फज्जा उडविला जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ५ एप्रिल राेजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश निर्गमित केला. या आदेशानुसार साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लाेकांना एकत्र येण्यास बंदी अर्थात जमावबंदी आदेश लागू केला आहे, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घाेषित करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८, २६९, २७०, २७१ नुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी साेमवार, ५ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. मंगळवारपासून भंडारा शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. मात्र, रस्त्यावर नागरिकांची माेठी गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठ बंद असताना नागरिक गर्दी कशासाठी करतात, हा संशाेधनाचा विषय आहे. शहरातील गांधी चाैक, राजीव गांधी चाैक, बसस्थानक चाैक, त्रिमूर्ती चाैक, जिल्हा परिषद चाैक यासह विविध भागात नागरिक रस्त्यावर दिसून येतात. शहरातील केवळ किरणा आणि फळ व भाजीपाल्यांची दुकाने, तसेच औषधी दुकाने सुरू आहेत. कामानिमित्त बाहेर निघणाऱ्यापेक्षा रिकामटेकडी मंडळीच रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. बुधवारी जिल्ह्यात ११७७, तर भंडारा तालुक्यात ८३६, तर गुरुवारी जिल्ह्यात १०४६, तर भंडारा तालुक्यातील ३८० रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण एकट्या भंडारा शहरातील आहेत. असे असतानाही नागरिक मात्र जमावबंदीचा आदेशाचा फज्जा उडवीत आहेत.

कुठे आहे कडक अंमलबजावणीजिल्हाधिकारी, जिल्हा पाेलीस अधीक्षक आणि भंडारा ठाणेदारांनी काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, जमावबंदी आदेशाचा फज्जा उडत असतानाही कुठेही कारवाई झाली नाही. नगर परिषदेचे पथक केवळ दुकानदारांवर आणि विनामास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई करतात. परंतु, जत्थ्याने एकत्र येणाऱ्या नागरिकांना काेणतीही तंबी दिली जात नाही. भंडारा ठाणेदारांनी साेमवारी पाेलिसांना अशा बिनकामाच्या भटकंती करणाऱ्या व्यक्तींना पाेलिसी प्रसाद देण्याचे निर्देश दिले. मात्र, गत चार दिवसांत कुठेही अशी कडक कारवाई झाली नाही. काेराेनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक बेजबाबदारपणे फिरत आहे. शहरातील चाैकांमध्ये असणारी ही गर्दी काेराेना संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. आता जिल्हा पाेलीस अधिकक्षकांनीच या प्रकरणी लक्ष देवून जमावबंदी आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या