शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:20 IST

जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही.

आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे उदासीन धोरण, दुर्गंधीयुक्त वातावरणविशाल रणदिवे अड्याळ जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गोंडराजाच्या काळात बांधण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाचा उपयोग शेती उत्पादनासोबतच मासेमारी, सिंगाडे उत्पादन, जनावरांना पिण्याचे पाणी, कपडे दुधे आदी कामासाठी हे तलाव उपयुक्त होते. मामा तलाव निर्मिती करणाऱ्यांनी दूरदृष्टिकोन ठेऊवूाच यांची निर्मिती केली. मात्र आधुनिकी करणाच्या नावाखाली होत असलेला सरकारचा दुर्लक्षीतपणा यामुळे या तलावांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प तयार करण्याच्या मानसिकतेतुन या तलावावर दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील कित्येक वर्षापासुन गोसे प्रकल्प, नेरला उपसा सिंचन पुर्णत्वास आणण्याचे काम सुरु आहे आणि त्यासाठी शेकडो, हजारोंच्या संख्येत कामगार वर्ग काम करीत आहेत. परंतु पुर्ण आजही झाले नाही. या गोसे प्रकल्पामुळे व नेरला उपसा सिंचनामुळे शेतजमीनीला सिंचन उपलब्ध होणार आहे. अड्याळ व परिसरात जेव्हा जेव्हा शेतजमीनीला एका पाण्याची गरज भासते तेव्हा या मामा तलावाची गरज भासते. ते काही प्रमाणात पुर्णही होते. शेतकऱ्यांचाही दुर्लक्षा होत असला तरी पदाधिकारी, समाजसेवक, नेतेमंडळी कुणीतरी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रकल्प जेव्हा पूर्ण होणार तेव्हा लाभ होणारच पंरतु जो आहे जो कधीही कुणाच्याही कामात पडू शकतो त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाहीच!अड्याळ येथील बाजार ग्राउंडकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुकडील हा तलाव दुर्गंधीयुक्त आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व सभोवताल राहणारे ग्रामस्थ या दुर्गंधीचा रोजच त्रास सहन करवा लागतो. कित्येक वर्षापासुन मूर्तीचे विसर्जन होत असते. परंतु आजपावेतो या तलावातील गाळ उपसण्यात आला नाही. आजुबाजुला आता पक्के घरे बनली पंरतु त्या तलावाची सिमा रेषा रेकार्डवर दिसते प्रत्यक्षात दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे दुर्लक्ष. प्रशासनाला तेथील पदाधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळमध्ये या तलावांची संख्या चार आहे. यावर जिल्हा परिषदेचे हक्क असल्याचे बोलले जाते. परंतु याची सीमारेषा नसल्यामुळे येथेही अतिक्रमण आल्यासारखेच आहे. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालुन ज्या तलावाची स्थिती दयनीय आहे किंवा ज्या तलावामुळे तेथील दुर्गंधीमुळे ग्रामस्थाचें आरोग्य धोक्यात आले आहे. अशा तलावातील गाट उपसा करणे, साफसफाई करणे, सुशोभीकरण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.