शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटींऐवजी ४६ कोटी भरले

By admin | Updated: June 29, 2014 23:46 IST

तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. महावितरण व बीएफआयआर बोर्ड यांच्यात नुकतीच दिल्ली येथे बैठक झाली.

मोहन भोयर - तुमसर
तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. महावितरण व बीएफआयआर बोर्ड यांच्यात नुकतीच दिल्ली येथे बैठक झाली. कारखाना व्यवस्थापनाने बैठकीत ठरलेल्या करारानुसार वीज बिलाचे ४६ कोटी नुकतेच भरले. यामुळे कारखान्याचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.
युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. या कारखान्याला एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन) ने सवलतीच्या दरात वीज पुरवठा दिला होत. परंतु केवळ देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट या कारखान्याला होती. कराराचा भंग केल्याचा ठपका या कारखान्यावर ठेवून सवलतीच्या दरातील वीज देणे बंद करून जुने वीज बिल वितरण कंपनीने बाजारभावाप्रमाणे वसुल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वीज बिलच्या रकमेत मोठी वाढ झाली.
१९ सप्टेंबर १९९६ लाया कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. राज्य शासन व कंपनी व्यवस्थापनात एका करारानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. सन २००३ मध्ये कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून हा कारखाना बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २५० कोटींची थकबाकी होती.
क्लोजरची मागणी
दरम्यान या कारखान्यात सुमारे १२०० कामगार कार्यरत होते. कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची मागणी सन २००६ मध्ये केली. नियमानुसार ते त्यांना मिळाली. आजारी कारखान्याचा प्रश्न दिल्ली येथील बीएलआयआर बोर्ड आॅफ फायनान्स अँड रिकंस्ट्रशनकडे कंपनी व्यवस्थापनाने मांडला. येथील सुमारे ७०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. ३०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. त्या कामगारांना आता न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वप्रथम येथील कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयाने कामगारांच्या बाजूने न्याय दिला होता. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे. राज्य शासनाने अभय योजना सुरु केली होती. त्यात या कारखान्याला १२५ कोटी भरणे होते. परंतु या योजनेला कंपनी व्यवस्थापनाने दाद दिली नव्हती. आता महावितरण व बीएफआयआर यांच्यातील करारात ४६ कोटी कंपनी व्यवस्थापनात करार झाला. महावितरणची देणी झाल्यानंतर कारखान्याचा पुढील मार्ग मोकळा झाल्याचे दिसते.