शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

राज्यमार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM

दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असल्यावरही रस्त्याची वाईट अवस्था हा चिंतेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देभंडारा-वरठी राज्य महामार्ग : खड्ड्यांची बेसुमार चाळण, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून नावारूपास असलेला भंडारा-वरठी राज्य महामार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असल्यावरही रस्त्याची वाईट अवस्था हा चिंतेचा विषय ठरत आहे. भंडारा - वरठी राज्य महामार्ग हा मृत्यूमार्ग ठरला असून अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.भंडारा - वरठी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्थानक असल्यामुळे दिवस रात्र प्रवाशांची रेलचेल सुरू राहते. भंडारा पासून वरठीपर्यंतचे दहा किमी अंतराच्या रस्त्यावर अनेक भागातील रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. दर दोन फुटावर पडलेले खड्डे मोजण्यापलीकडे असून पावसाचे पाणी त्यात साचल्याने प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे अपघातांना कारणीभूत असून विद्यार्थी व नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहेत. अनेक भागातील रस्ता खोदकामामुळे अनेक ठिकाणी त्याचे निशाण आहेत. योग्य प्रमाणात डागडुगी न झाल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.जगनाडे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व डॉ. आंबेडकर चौक ते बसस्थानक आणि जुना तुमसर बायपास रस्त्याची हालत एकदम खस्ता झाली आहे.सदर रस्ता पूर्णत: उखडला आहे. रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तलाव जवळील रस्ता व बसस्थानक मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचल्याने रस्ता आहे की खड्डा हे दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना कमालीचा फटका बसतो. रस्ता रहदारीचा असल्यामुळे दिवस रात्र रस्त्यावरून वाहन व पादचाऱ्यांची रेलचेल राहते. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात पाणी साचून असल्याने पादचारी व दुचाकीस्वारांना कमालीचा फटका बसतो. खड्ड्यातील पाणी उडाल्याने अनेकांना आपले काम सोडून घरी परतावे लागत असून अनेकांना खड्ड्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.दाभा ते मेहंदी पूल रस्ता ओलांडणे म्हंणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्यावरून भरधाव धावणारे रेती वाहून नेणारे वाहने आणि रस्त्याची अवस्था वाईट असल्याने हमखास अपघात होताना दिसतात. मेहंदी पुलापासून ते दाभा वळण रस्त्यापर्यंत एकदम खराब रस्ता आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या अनेक भागातील डांबर उखडले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुगी करण्यात आली होती. अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याच्या कामामातील गैरप्रकार उजेडास आला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.ऑटोरिक्षा चालकांना फटकाभंडारा - वरठी महार्गावर सर्वाधिक प्रवाशी ऑटोरिक्षा धावतात. रस्त्याच्या वाईट अवस्थेचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. रस्त्याची वाईट अवस्था व रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे त्रासदायक ठरत आहे. प्रवाशांचे वेळापत्रक सांभाळताना रस्त्यावरून धावणाऱ्या ऑटोरिक्षा चालक कमालीचे संतापले आहेत. इतर वाहनांच्या तुलनेत त्यांच्या वाहनांची होणारी तुटफूट व नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. इतर प्रवाशी वाहनांच्या तुलनेत असलेले लहान आकार व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे त्यांना अकारण त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ऑटो रिक्षाच्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोहचत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRainपाऊस