शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:18 IST

ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ११ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
भंडारा : ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि.११ जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद चौकातून मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यात शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेला संघटनचे राज्य सरचिटणीस अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विलास खोब्रागडे आदींनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवकांनी केली. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाही. सहनशिलतेचा अंत झाला आहे. ग्रामसेवक गावात ग्रामसभा घेतो, वार्षिक सभा घेतो, दुष्काळ पडल्याच्यानंतर अतिशय प्रभाविपणे काम करीत असतो.
ग्रामपंचायती आॅनलॉईन करणे, ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहचविणे आदी विविध अभियानात ग्रामसेवकांनी नाविन्यपुर्ण कामे केली आहेत. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढला आहे.
शासनाने आतातरी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतनतृटी दुर करावी, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरावे, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करण्यात यावे आदी मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दि.११ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोर्च्यात शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विवेक भरणे, पी.आर. भुयार, एन.एस. घोडीचोर, जे.एम. वेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, अशोक ब्राम्हणकर, प्रदीप लांजेवार, एन.सी. बिसेन, अमित चुटे, एन.एच. जिरितकर, गोकुळा सानप, वाय.डी. उपरीकर, मंगला डहारे, विलास खोब्रागडे यांच्यासह शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले. (नगर प्रतिनिधी)