शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 5:00 AM

बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.

ठळक मुद्देजलाशय तुडूंब : अवकाळीचा शेतीला फटका, मात्र सिंचन प्रकल्पाच्या साठ्यात वाढ

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानीचा ठरत असला तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी संजीवनी ठरत आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सदर जलाशय तुडूंब भरल्याने परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.१ जानेवारीपासून प्रकल्प स्थळातील पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने हा जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलाशय तुडूंब भरत असताना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पर्यटकांना वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी जलपातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे.जलसाठ्याचे नियोजन गरजेचेउन्हाळ्यात पाणीटंचाईचे चित्र राहत असल्याने जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी अवकाळी पावसाने प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत दोन महिने नदीपात्रात पाणी होते, परंतु विजेचे ब्रेकडाऊन असल्याने पंपगृह सुरु करण्यात आले नव्हते. १ जानेवारीपासून प्रकल्पस्थळात पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. ३६ फुट पाणी साठवण करण्याची क्षमता असणाºया चांदपूर जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असण्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात