शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना दिलासा

By admin | Updated: June 2, 2016 02:27 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरु

अशोक पारधी पवनीबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरु आणि वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे, याबाबत . २८ आॅगस्ट २०१५ रोजी शासन आदेश निर्गमीत करण्यात आलेला होता. त्या आदेशान्वये राज्यातील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरून मुख्याध्यापकाशिवाय शाळा अशी स्थिती निर्माण झालेली होती. मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय व विभागीय संघटनांनी हा गंभीर प्रश्न लावून धरल्याने शासनाने २७ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशान्वये अतिरिक्त ठरलेल्या सर्व मुख्याध्यापकांना सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत शाळेत मुख्याध्यापकाचे पदावर कायम राहता येणार आहे.२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेले मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकाच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे. परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला होता व त्यानुसार २०१५-१६ ची संचमान्यता करण्यात आलेली होती. संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकाचे पद गोठविण्यात आले होते. शैक्षणिक दर्जावर व गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक यांचेकडे बैठका आयोजित करून मुख्याध्यापक पदाची बाजू प्रभावीपणे मांडली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. २७ मे रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयाद्वारे अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना दिलासा मिळालेला आहे. शासन निर्णयातील प्रस्तावित सुधारणेनुसार शाळांमध्ये मान्य झालेले मुख्याध्यापकाचे पद शासन निर्णयअन्वये अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमधील मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधित शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यवगण करण्यात यावे. तसेच इयत्ता पाचवीच्या वर्गामुळे मंजूर होणारी शिक्षकांची पदे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पद मंजूर करताना गृहीत ठरण्यात येणार आहेत.