शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो.

ठळक मुद्देबळीराजाला पावसाची प्रतीक्षा : गावागावातच मुबलक मजूर उपलब्ध होण्याची दाट शक्यता

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात यावर्षी रविवारी २४ मे रोजी प्रवेश होत असून रोहिणी नक्षत्रात यंदाचा मान्सून बरसेल, या आशेने शेतकऱ्यांनीही मान्सूनपुर्व कामाला मोठ्या तन मन धनाने सुरुवात केली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या तप्त उन्हामुळे शेतकऱ्यांना आता पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील काडी कचरा गोळा करणे, धुरा साफ करणे, शेतात शेणखत घालणे, नांगरणी करून ठेवणे इत्यादी आवश्यक कामे शेतकरी मोठ्या आशेने व आनंदाने करताना दिसत आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो. त्या नुसार शेतीच्या कामाला सुरुवात करतो.
यंदा रोहिणी नक्षत्रात पहिला पाऊस बरसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंगाला भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता वातावरणात बदल होत आहे. लवकर पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकºयांनीही मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. पंचांगानुसार पावसाची एकूण बारा नक्षत्रे आहेत. त्यानुसार नक्षत्राचे वाहन, पाऊसमान अंदाजे सांगितले आहे. यावर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्रापासून होत आहे. ७ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन म्हैस आहे. पाऊस चांगला होईल तर २१ जूनपासून आद्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन घोडा आहे. जुलैपासून पुनर्वसु नक्षत्र सुरु होत आहे. वाहन उंदीर आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा पंचांगानुसार विविध अनुमान सांगितले आहे
अड्याळ आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी संकटकाळात नेरला उपसा सिंचनाचा मोठा आधार मिळत आला. परंतु दरवेळी काही तरी विषय व्हायचा आणि जेव्हा शेतकरी रस्यावर यायचे त्यावेळी पाणी मिळायचे. शेतकऱ्यांना अडयाळ आणि परिसरात सध्या शेतकरी एकच चर्चा करत आहेत ते म्हणजे नेरला उपसा सिंचन सुरु व्हायला गतवर्षी पाण्याची पातळी नव्हती, निदान आता तरी पाण्याची पातळी उपलब्ध करून ठेवली तर पुढे संकटकाळात हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आता यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती