शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो.

ठळक मुद्देबळीराजाला पावसाची प्रतीक्षा : गावागावातच मुबलक मजूर उपलब्ध होण्याची दाट शक्यता

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात यावर्षी रविवारी २४ मे रोजी प्रवेश होत असून रोहिणी नक्षत्रात यंदाचा मान्सून बरसेल, या आशेने शेतकऱ्यांनीही मान्सूनपुर्व कामाला मोठ्या तन मन धनाने सुरुवात केली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या तप्त उन्हामुळे शेतकऱ्यांना आता पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील काडी कचरा गोळा करणे, धुरा साफ करणे, शेतात शेणखत घालणे, नांगरणी करून ठेवणे इत्यादी आवश्यक कामे शेतकरी मोठ्या आशेने व आनंदाने करताना दिसत आहे.बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो. त्या नुसार शेतीच्या कामाला सुरुवात करतो.यंदा रोहिणी नक्षत्रात पहिला पाऊस बरसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंगाला भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता वातावरणात बदल होत आहे. लवकर पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकºयांनीही मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. पंचांगानुसार पावसाची एकूण बारा नक्षत्रे आहेत. त्यानुसार नक्षत्राचे वाहन, पाऊसमान अंदाजे सांगितले आहे. यावर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्रापासून होत आहे. ७ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन म्हैस आहे. पाऊस चांगला होईल तर २१ जूनपासून आद्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन घोडा आहे. जुलैपासून पुनर्वसु नक्षत्र सुरु होत आहे. वाहन उंदीर आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा पंचांगानुसार विविध अनुमान सांगितले आहेअड्याळ आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी संकटकाळात नेरला उपसा सिंचनाचा मोठा आधार मिळत आला. परंतु दरवेळी काही तरी विषय व्हायचा आणि जेव्हा शेतकरी रस्यावर यायचे त्यावेळी पाणी मिळायचे. शेतकऱ्यांना अडयाळ आणि परिसरात सध्या शेतकरी एकच चर्चा करत आहेत ते म्हणजे नेरला उपसा सिंचन सुरु व्हायला गतवर्षी पाण्याची पातळी नव्हती, निदान आता तरी पाण्याची पातळी उपलब्ध करून ठेवली तर पुढे संकटकाळात हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आता यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती