शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

देश हादरवणारी घटना महिनाभरातच विस्मृतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून ...

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही, तर उच्चस्तरीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टर, परिचारिकांवर कारवाई करण्यात आली.

मात्र या घटनेकडे कुणीच गांभीर्याने बघितले नाही, असे दिसून येते. विरोधी पक्षातील लोकांना काही मागण्या केल्या; परंतु त्याचाही फारसा प्रभाव पडला, असे आता म्हणता येत नाही. ज्या कुटुंबातील दहा बालकांचा या अग्निकांडात बळी गेला त्यांचे सांत्वन करण्यात आले. तातडीने आर्थिक मदतही करण्यात आली. मात्र या घटनेला असलेले मूळ कारण अद्यापही पुढे आले नाही. न्यायवैद्यक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु आता तो विषयही जणू विस्मृतीत गेल्याचे दिसून येते.

कुणावर कारवाई झाल्याने गेलेले दहा जीव परत येणार नाहीत. परंतु भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी दोषींना शिक्षा होणे गरजेचे असते. परंतु येथे निर्ढावलेली आरोग्य यंत्रणा कुणाच्यातरी दबावात वावरत असल्याचे दिसत आहे. भंडारा ठाण्यात केवळ या दहा बालकांच्या मृत्यूची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. दहा जीवांना न्याय देण्यासाठी कोणी तरी गांभीर्याने या विषयावर रस्त्यावर उतरायला हवे, परंतु आता महिनाभरानंतर या घटनेतील गांभीर्य संपले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

बॉक्स

जिल्हा रुग्णालय सुधारता सुधरेणा

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या आठ-दहा दिवसांत ही यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतही होती. परंतु आता पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. वेळेवर कुणीही भेटत नाही. अनेकदा तर रुग्णांच्याच नातेवाइकांना स्टेचर ओढर रुग्णाला वॉर्डात न्यावे लागते. पट्टीबंधन कक्षातही अशीच अवस्था आहे. एका रुग्णाला तर स्वत:च ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.