शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात हरविले लहानग्यांचे आजोळ

By admin | Updated: November 1, 2014 01:58 IST

संगणक युगात जे हवे ते एका क्लिकवर मिळते. मार्केटिंगच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर तर संगणकावरुन आप्तेष्टांशी घरबसल्या चर्चा करता येते.

गोंदिया : संगणक युगात जे हवे ते एका क्लिकवर मिळते. मार्केटिंगच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर तर संगणकावरुन आप्तेष्टांशी घरबसल्या चर्चा करता येते. तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीच्या सुटीतील लहानग्यांचे विश्व मात्र संकुचित होत असल्याचे दिसून येते. किल्ले, मामाचे गाव हरवत जात असून आता सुट्यांमध्ये पर्यटनाला जास्त पसंती दिली जात आहे.
मामाच्या गावाला एखादी धावती भेट किंवा एखाद्या घरातील अंगणात नजरेस पडणारा मातीचा किल्ला, एवढेच काय ते जुन्या खुणा शिल्लक असल्याचे समाधान देऊन जाते. अगदी दिवाळीच्या सणात मुलांचे खास आकर्षण म्हणजे मातीचा किल्ला, मामाचे गाव. मात्र मोबाईलच्या सपाट्यात हे चित्र हरवत चालले असल्याचा प्रत्यय येतो. मोबाईलवर गेम्स खेळण्यात दंग असणारी चिमुकली मुले या पारंपरिक आनंदापासून वंचित राहात असल्याचे दिसते. हायटेक जीवनशैलीमुळे मातीचा किल्ला प्रत्यक्षात बनविताना होणारी धावपळ, तगमग, आठ-आठ दिवसांची मेहनत, आईची आरडाओरड, मित्रांची साथ, विसरलेली तहानभूक, मातीचा गंध, किल्ला बनविण्याची चढाओढ कमी झाली. आजोळी मामाच्या गावी जाणे या साऱ्यातील आनंदच जणू कुठेतरी हिरावला गेला असल्याचे भासते. तंत्रज्ञान जसे विकसित झाले, तसा शहरीकरणाचा वेगही वाढू लागला आहे. शहरे मोठी होऊ लागली. या मोठ्या शहरांत ग्रामीण भागातील लहानग्यांचे बालपण मात्र हरवत चालले आहे.
शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याबद्दल मुले प्रचंड उत्सुक असायची ; पण आता मात्र हा क्लास, तो क्लास, हे शिबिर, ते शिबिर म्हणत दिवाळीची सुटीच संपून जाते आणि मामाचे गाव, दिवाळीत मातीचा किल्लाही मागे पडतो. शहरी भागात काही ठिकाणी किल्ला पहायला मिळतो, तोही रेडिमेड असतो. हा किल्ला मग कुठेतरी गॅलरी, हॉलमध्ये तात्पुरता 'शो' साठी ठेवला जाते. या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या बालपणात तयार केलेली मातीचे किल्ले आजची मुले तयार करताना दिसत नाहीत, हे मोठांना जाणवते. काही ठिकाणी किल्ले बनविण्याच्या स्पर्धा ठेवून मुलांमध्ये आवड निर्माण केली जात आहे.
संगणक युगात हा मायेचा ओलावा, मातीशी आणि आपल्या इतिहासाशी जोडलेली नाळ कुठेतरी तुटत आहे. मोबाईलमुळे या गोष्टी प्रभावित होत असल्याचा प्रत्यय येत आहे. झुकझुक आगीन गाडी या गीतातील ओवींप्रमाणे मामाचा गाव हवेतच विरत असल्याचे दिसते.