शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:01 PM

जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर पुन्हा संकट : मोका चौकशी करून मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे धानासह रबी पिकाला चांगलाच फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. भंडारा शहरात सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली.पवनी : मागील काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्याचे दर्शन झाले नाही. पवनी शहरात पाऊस बरसला नाही. धानाची मळणी काहींची झाली, काहींची व्हायला आहे. अशा वातावरणात रब्बी हंगामातील पिकावर अळी पडते असा शेतकऱ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला अशी पीकं घेतली जातात. अशा सर्व पिकांचे अळी पडल्याने नुकसान होत असते. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्गाला चिंता सतावत आहे.साकोली : मागील दोन तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून कडाक्याची थंडी आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस आला. याचा फरक आज आठवडी बाजारावर पडला आहे. शेतात कठाण माल असून या पावसाचा तेवढा परिणाम पडला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे नक्कीच फरक पडणार आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकºयांचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. जर जोराचा पाऊस आला तर धान नसविण्याची होण्याची शक्यता आहे.जवाहरनगर : सतत तीन दिवसापासून जवाहरनगर व इतर परिसरात ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शनही झाले नाही. आज सकाळी ८.३० वाजता सुमारापासून ११ वाजतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे शेतावर कापलेले धान पिकास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालांदूर : दहा दिवसांपासून ढगाळ हवामानाने मानवी जीवनासह बागायती कडधान्याची शेती प्रभावित झाली आहे. रविवार सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आले. मोठा पाऊस येणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. मात्र परिसरात तुतळक पावसाची हजेरी लागली. तुळीच्या शेंगा पोखरणारे पोषक हवामान असल्याने तूर पीकाचे नुकसान झाले आहे. उघड्यावर धान खरेदी केंद्रावर धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मिळेल ती साधने वापरीत धान झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मोठा पाऊस आल्याशिवाय आभाळ खुलणार नाही, असे जाणकारांचे म्हणने आहे.

टॅग्स :Rainपाऊस