शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

रेतीच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा खमाटा व टाकळीवासीयांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेतीची अवैध वाहतूक बंद करण्यात यावे, अशा ट्रॅक्टर, ट्रक, जेसीबी चालक मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील खमाटा, टाकळी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा तालुक्यातील खमाटा टाकळी गाव वैनगंगा व सुरनदीच्या मध्यभागी आहे. येथे जुनी टाकळी रेती घाटातून ट्रॅक्टरद्वारे दिवसरात्र २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरनी रेतीचा अवैधरित्या उपसा सुरु आहे. रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. तसेच रेती वाहतूकीची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. नागरिक भयभीत होऊन जीवन जगत आहे. त्यामुळे येथे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवासह जनावरांचा जीवही सातत्याने होणाऱ्या वाहतुकीने धोक्यात आला आहे. अनेक ट्रक चालक हे शेतकऱ्यांना रस्त्यावरील ट्रक, ट्रॅक्टर बाजूला घे असे हटकले असता अरेरावी करीत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन रेती तस्करांच्या पाठीमागे उभे आहे का? अशी चर्चा गावातून सुरु आहे. जिल्ह्यात रेतीचा अवैध उपसा सुरुच असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. यासंदर्भात योग्य कारवाई करावी अशी मागणी खमाटा टाकळी येथील रहिवासी जयंता आस्वले यांच्यासह गावकºयांनी केली आहे.सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी एकत्र येत भंडारा तहसीलदार, वरठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देवून समस्या मांडली. मात्र याकडे अद्यापही कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांविरुध्द तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात गौरी राघोर्ते, मंजु आस्वले, रेखा ढेंगे, वैशाली गायधने, शालांदर आस्वले, विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, कोठीराम पवणकर, राजकुमार भोपे, योगेश गायधने, धिरण भोपे, जयंता आस्वले आदींचा सहभाग होता.

टॅग्स :sandवाळू