शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीठ टंचाईच्या अफवेने खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगून कृत्रीम तुटवडा निर्माण केला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात चढत्या दराने विक्री : अन्न पुरवठा विभागाच्या आदेशाची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊन काळात मिठाचा तुटवडा असल्याचे सांगून जिल्ह्यात अफवा पसरविली जात आहे. याचे परिणाम दिसून येत असून मीठ खरेदीसाठी नागरिकांनी किराणा दुकानात एकच गर्दी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे याचा काही किराणा व्यवसायीक फायदा घेत असून चढत्या दराने मिठाची विक्री करीत आहे. ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास घडत आहे.
कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगून कृत्रीम तुटवडा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे शासनाने जीवनावश्यक वस्तुच्या पुरवठ्याबाबत दक्षता घेतली असून या वस्तुंचा साठेबाजार करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न पुरवठा विभागांतर्गत कठोर निर्देश देण्यात आले आहे.
लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात महिला पुरुष नागरिक सकाळपासूनच मीठ खरेदीसाठी एकच धावपळ करीत आहेत. आंतरराज्यातून मिठाची आयात होत नसल्याची भीती दाखवून मिठाच्या तुटवड्याची संभाव अफवा पसरताच मीठ खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. याचाच फायदा व्यवसायीक घेत असून चढत्या दराने मीठाची विक्री केली जात आहे. यासंदर्भात लाखांदूर तालुका किराणा संघटन असोसिएशनचे अध्यक्ष बंटी सहजवाणी म्हणाले, जीवनावश्यक वस्तुचा तुटवडा भासविणे चुकीचे आहे. तालुक्यात जीवनावश्यक वस्तुचा कुठेही तुटवडा नाही. नागरिकांनी या अफवाना बळी न पडता, योग्य दरातच जीवनावश्यक वस्तु व पदार्थांची खरेदी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लाखनी तालुक्यातील अनेक गावातही मिठाच्या टंचाईबाबत अफवा पसरविल्याने किरकोळ दुकानदार मिठाची अधिक भावाने विक्री करीत आहेत. तालुक्यात मात्र मिठाची कुठलीही टंचाई नाही. पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार गावासह परिसरात दुप्पट किंमतीत मीठ विकले जात आहे. काही ठिकाणी दुप्पट किंमत देवूनही मीठ मिळत नसल्याची तक्रार आहे. मीठ १०० रुपये किलोने मिळणार अशी अफवाच गावात पसरविण्यात आली. छत्तीसगढ राज्यात मीठाचा तुटवडा भासल्याने तेथील काही लोकांनी जिल्ह्यात असलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींना भ्रमणध्वनीवरुन सांगितले. याचेच पडसाद गाव व जिल्ह्यात पहायला मिळत आहे. १५० रुपयाला मिळणारी मीठाची पोती २०० रुपये भावाने मिळत आहे. याबाबत येथील किराणा व्यापारी इद्रीस लध्दानी म्हणाले, मीठ टंचाईबाबत अफवा पसरविली जात असून खोट्या अफवांना कुणीही बळी पडू नये. पालांदूरात एक-दोन दिवसात मीठाचा मुबलक साठा प्राप्त होणार आहे.

सकाळी सकाळी पसरली अफवा
मिठाची टंचाई निर्माण झाल्याची सकाळी सकाळी कुठूनतरी ग्रामीण भागात अफवा पसरली. मिठाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याच्या वार्ता गावभर चर्चील्या जाऊ लागल्या. ही चर्चा वाऱ्यासारखी पसरताच किराणा दुकानात गर्दी उसळू लागली. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही अनेकांनी आवश्यकतेपेक्षा अधिक मीठ खरेदीचा सपाटा लावला. मात्र ही अफवा नेमकी कशी आणि कुणी पसरविली याचा दिवसभरही थांगपत्ता लागला नाही.

टॅग्स :Socialसामाजिक