शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भंडारा रोड रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देनवीन गाड्या वाढविण्याची गरज : प्रवाशांना रेल्वेच्या अनियमिततेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील भंडारा रोड स्थानक जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वात सोयीस्कर आहे. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे.भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. भंडारा बसस्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यत वेळेवर पोहोचणे प्रवाशांना अनेकदा शक्य होत नाही. याच मार्गाने ऑटोरिक्षा वेगाने धावत असतात. इतर वाहनांची देखील मोठी वर्दळ असते. मोठ्या खड्यांंमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक व्यावसायीकांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली आहे. अरुंद रसत्यामुळे रेल्वे येते तेव्हा प्रवाशांची गर्दी आणि अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा मोठी धावपळ करावी लागते.पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचलेले असते. त्यातूनच मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायतने कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाहीत.वरठी रेल्वेस्थानक ते भंडारा बस बसस्थानकापर्यंत धावधाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपक्षा आधिक प्रवासी बसविले जातात. त्यांचा वेगही अधिका असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ऑटोरिक्षा चालक प्रवाशांशी हुज्जत घालत असतात. परंतु याकडे पोलीस आणि रेल्वे विभागाचे कायमच दुर्लक्ष दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वेगाड्या नियमित येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. रेल्वेस्थानक परिसरात अस्ताव्यस्त लागणाºया वाहनांच्या रांगा याचा देखील अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्षरेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत तिकीट विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे एक चौकशी कक्षाची स्थापना करुन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्वक आहे. त्यासोबतच विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी विशेष सुविधा तयार करण्याची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोबाईल चार्जिंगसारख्या प्राथमिक सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविणे गरजेची आहे.

टॅग्स :railwayरेल्वे