शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

२५५ शेतकरी विधवांची फरफट सुरुच

By admin | Updated: December 5, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी, धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरूच आहे़सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत भंडारा जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ त्यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १४१ आत्महत्यांची प्रकरणे पात्र ठरविले़ २५५ शेतकऱ्यांना मदतीपासून अपात्र ठरविण्यात आले़ यातील आठ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत़ पात्र १४१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी ३८ लाखांची मदत करण्यात आली़ मागील १३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, शासनाने २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अपात्रतेचा ठपका ठेवला आहे़ परिणामी, मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना मिळणाऱ्या सोई-सवलती प्राप्त होण्यास मोठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शेतकरी हिताच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याच जिवावर उठायचे असा हा खेळ आहे़ यावर्षी धानाचे उत्पादन जोमात असताना किडीचा प्रादूर्भाव, वातावरणात बदल यामुळे धानाचा उतारा कमी झाला़ एकरी १५ क्विंटल धान्य व्हायला पाहिजे. परंतु यावर्षी एकरी दोन क्विंटलपेक्षा कमी धान झाले. अ दर्जाच्या धानाला १,४६० रुपये, ब दर्जाच्या धानाला १,४१० रुपये, प्रति क्विंटल दर शासन देत आहे. समर्थन मुल्य १,४१० रुपयांप्रमाणे दोन क्विंटलचे २,८२० रुपये होतात. धान लागवडीसाठी एकरी १७ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात काहीएक उरत नाही. उलट मेहनतीचा खर्च व्यर्थ ठरतो. एकंदरीत घडाईपेक्षा मडाईतच शेतकरी होरपळला आहे.एकंदरित शासनाकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची होरपळ सुुरु आहे. नुकसानीपोटी केवळ पॅकेजची घोषणा केली जाते. हातात काहीही उरत नाही, हे वास्तव आहे. जगाच्या पोशिंद्याला मानाने जगता यावे, यासाठी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धानाला पाच हजार रुपये हमीभाव, शेतकऱ्यांना रोजगार हमीचे मजूर उपलब्ध करुन देणे, रासायनिक खते व किटकनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, आदी सोयी करणे गरजेचे आहे. परंतु, दुर्दैवाने यापैकी काहीच होत नाही. अधिवेशनाच्या तोंडावर केवळ राजकारण सुरु आहे. उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहेत.यावर्षी ४६ पैकी २० प्रकरणे अपात्रयावर्षी भंडारा जिल्ह्यात एकूण ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १८ शेतकऱ्याची आत्महत्या पात्र, तर २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अपात्र आहेत, असा अहवाल देण्यात आला़ आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणे तालुका स्तरावर प्रलंबित आहेत़ यातील सर्वाधिक ११ आत्महत्या लाखनी तालुक्यात आहेत़ प्रत्येकी ०३ आत्महत्या मोहाडी व तुमसर तालुक्यात, पवनी ०७, साकोली ०८, लाखांदूर तालुक्यात १०, भंडारा तालुक्यात ०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़