शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २४ हजार घरे, अधिकृत नळधारक केवळ १० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST

भंडारा : शहराच्या वाढीव लोकसंख्येसोबतच पाण्याचा प्रश्नही ज्वलंत बनला आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून जवळपास २४ हजार ...

भंडारा : शहराच्या वाढीव लोकसंख्येसोबतच पाण्याचा प्रश्नही ज्वलंत बनला आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून जवळपास २४ हजार ११० घरांची संख्या आहे. मात्र शहरात अधिकृत नळधारकांची संख्या १० हजार १४० असुन सार्वजनिक नळांची संख्या ३४० आहे.

भंडारा शहरात दशकभरात पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या पदरी निराशा हाती लागत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी नळधारकांची संख्याही वाढलेली दिसून येत नाही. वाढीव पाणी पुरवठा योजनेत नवीन जलवाहिन्यांसह नवीन जलशुद्धीकरण केंद्र निर्माण केले जाणार आहेत. मात्र कोरोना संकटकाळात पाणीपुरवठ्याची कामे प्रभावित झाल्याने ही योजना कार्यान्वित होण्यावर अजून बराच कालावधी लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबतच नळधारकांची संख्याही वाढेल अशी आशा होती. मात्र जागोजागी जलवाहिनीला लिकेज असल्यामुळे दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. यात नागरिकांनी आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले. भंडारा शहराला लागून वाहत असलेल्या वैनगंगा नदीपात्रातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आधी महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडे होती. मात्र दशकभरापेक्षा जास्त कालावधी झाला असून याची जबाबदारी भंडारा नगर परिषदेवर आहे. साधनांचा अभाव व जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे शहरात दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली. यामुळे अनेक नागरिकांनी नळाच्या पाण्यापेक्षा आरोचे पाणी पिणे सुरु केले.

आजही बहुतांश नागरिकांनी आरोचे पाणी सुरु केल्याने नळधारकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत नाही. लोकसंख्या व कुटुंबांच्या संख्येनुसार अधिकृतपणे नळधारकांचीही संख्या वाढण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. एकंदरीत गत दहा वर्षांच्या कालावधीत स्थानिक प्रशासन पाण्याच्या बाबतीत नागरिकांचे मन जिंकू शकले नाही.

शहरातही अनधिकृत नळ

भंडारा शहरातील घरांच्या तुलनेत नळधारकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत दहा हजार ११० अधिकृत नळधारक असून अनधिकृत नळधारक असल्याचे सांगण्यात येते. मात्र याची एकूण संख्या किती हे सांगणे अशक्यप्राय आहे.

गळती सुरूच

शहरातील जलवाहिनी ही ४० वर्षांपेक्षाही जुनी आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. आजही काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती सुरुच असल्याचा प्रकारही दिसून येतो.

शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना

शहरात दीड वर्षांपूर्वी ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली. यातून शहरात नवीन जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनी घालण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.

वाढीव लोकसंख्येच्या तुलनेत नळधारकांची संख्या वाढत असते. मात्र ही बाब आता नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिसून येईल. पाणीपुरवठा विभागामार्फत आलेल्या तक्रारींवर कार्य करीत असते. ज्या ठिकाणी लिकेज किंवा गळती असेल त्या ठिकाणची पाहणी करुन ते त्वरित दुरुस्त करण्यावर आमचा भर असतो. नागरिकांनीही समस्या असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्या निकाली काढण्यात येतील.

-विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगरपालिका भंडारा