शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत.

ठळक मुद्देचौकांनी घेतला मोकळा श्वास : आदर्श आचार संहितेअंतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्ह्यातील चौकाचौकात लावलेले २२५२ फलक हटविले आहेत. यात होर्डींग, बॅनर, पोस्टर आणि पॉम्प्लेटचा समावेश आहे. यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होताच आदर्श आचारसंहिता सुरु झाली. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले.या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद, नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खासगी व शासकीय कार्यालय परिसरात असलेले होर्डींग, बॅनर, पोस्टर्स ४८ तासाच्या आत हटविण्याची कारवाई निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. साकोली, तुमसर आणि भंडारा विधानसभा क्षेत्रातील तब्बल २२५२ फलक हटविण्यात आले आहेत.तुमसर क्षेत्रात सर्वाधिक १५४९, साकोली ५२४ आणि भंडारा क्षेत्रात १७९ फलकांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे बॅनर, पोस्टर्स, फलक लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास आणि खासगी ठिकाणी लावण्यात आलेले फलक ७२ तासात हटविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. हटविण्यात आलेल्या जागेवरील फलक पुन्हा लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.शहरी भागासह ग्रामीण भागात नेत्यांच्या वाढदिवसापासून ते विविध कार्यक्रमांचे फलक लावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतरही महिनोंमहिने फलक दिसून येत होते. आता आदर्श आचारसंहितेने सर्व फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.सोशल मीडियावर सायबर सेलची नजरविधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, धर्माची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलीन होईल असे मॅसेज फॉरवर्ड करू नये. विशेष म्हणजे सोशल मिडीयावरील मॅसेजला सायबर सेल मॉनीटरींग करणार आहे. अनावधानाने सुद्धा पोस्ट लाईक किंवा शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019