शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रपंच सांभाळून परमार्थ करण्याची गुरुकिल्ली- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 8, 2021 15:22 IST

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोष्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला. 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज १०७ वी पुण्यतिथी! ज्यांना आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखतो, त्यांचे पूर्ण नाव, गणपती रावजी गोंदवलेकर. त्यांचा जन्म गोंदवले येथे १८४५ मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना देवधर्माची आवड होती. त्यांना नामाची अतिशय गोडी होती. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून, गुरुंच्या शोधार्थ त्यांनी बरीच भ्रमंती केली. अमर्याद प्रवास केला. अनेकदा काशीला जाऊन आले. नैमिषारण्यातील दऱ्याखोऱ्यांतून ते अनेकदा हिंडले. नर्मदा किनाऱ्यावरील महेश्वर गावातील दोन प्रख्यात मांत्रिकांनी महाराजांना सर्पांनी वेष्टून बांधून ठेवले. परंतु महाराजांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला व त्यांना नामाचा मंत्र दिला.

हेही वाचा : गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी : रामनामाची महती पटवून देत जनसेवा अन ईश्वरसेवा करणारे गुरु!

बेळगावचे थोर ब्रह्मज्ञानी तुकाराम चैतन्य या सद्गुरुंची व महाराजांची भेट झाली. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन महाराजांना वयाच्या पंधराव्या वर्षी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त झाली.  रामकृष्णमहाराजांना ते भेटले. त्यांनीच महाराजांना तुकाराम सद्गुरुंकडे जाण्यास सांगितले. त्यांना महाराज शरण गेले. महाराजांना जे हवे होते, ते त्यांना सद्गुरु तुकाराम महाराजांकडे मिळाले. निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांना सद्गुरुंपाशी मिळाले. ते परमात्मास्वरूप होते. त्यांनी महाराजांवर खूप प्रेम केले.

लहानपणापासून नामाची कृपा महाराजांवर होती. त्यांनी काय करावे याबद्दल त्यांना आतून नामच मार्गदर्शन करी. गोंदवलेकर महाराज म्हणत, `शुद्ध परमात्मास्वरूप सगुण व निर्गुण या दोहींच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडले आहे. ते सर्वव्यापी, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे. ते आहे इतकेच त्यांच्याबद्दल बोलता येते.

ईश्वर हा चिन्मय आहे. जाणीवरूप आहे. तरी तो कर्ता असून, अकर्ता राहतो. सर्व घटना घडवून आणतो. आनंदाने भरलेला ईश्वर माया नावाच्या विलक्षण शक्तीने विश्वाचा व्यवहार करतो. त्याला विसरले की माया छळू लागते. पण स्मरण केले की तीच भक्तीला मदत करते. भगवंताच्या भक्तीने त्याची कृपा होऊन तो मायेतून सुटतो. सर्व सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ऊँकारातून म्हणजे नादब्रह्मातून तिची उत्पत्ती झाली. ऊँकार म्हणजेच नाम होय. नाम हे सामान्य, सूक्ष्म रुपाने अदृश्य तर रुप हे दृश्य रुपाने स्थूल आहे. अनेक रुपांना एकच नाम व्यापून असते. नामाच्या योगाने वासनेत गुंतलेला जीव बाजूला सरतो. नामस्मरण म्हणजे 'मी भगवंताचा आहे' ही अखंड जाणीव. सद्गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने व प्रेमाने नाम घ्यावे. त्यातूनच भगवंताला शरण जाण्याची बुद्धी होते. असे महाराज सांगत. 

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोष्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला. 

महाराजांच्या हृदयात विश्वामध्ये व्यापून राहणारा ऊँकार नामाचे रूप घेऊ झणत्कार करीत असे. महाराज सर्वांना सांगत असत, `मी तुमच्याजवळ आहे, असं मी म्हणतो त्यावेळी `मी' ही व्यक्ती नसून परमात्मास्वरूप तुमच्याजवळ आहे, असा त्याचा अर्थ असतो. 

एका नामामध्ये भगवंताच्या दर्शासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहतो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प, नाम घ्या. 

हेही वाचा : देवाचे स्मरण करताना आधी मुखात नाम यायला हवे की डोळ्यासमोर रूप?