शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
4
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
5
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
6
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
7
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
8
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
9
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
10
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
11
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
12
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
13
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
14
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
16
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
17
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
18
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
19
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
20
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
Daily Top 2Weekly Top 5

Food Habit: रोजच्या अन्नात प्रसादत्त्व उतरावे म्हणून जेवणाआधी म्हणा 'हा' श्लोक; आजारपणापासून होईल सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:41 IST

Food Habit: जेवणासंबंधीचा हा श्लोक तुम्ही पाठ केलात आणि मुलांकडून करून घेतलात तर अन्न फेकण्यासाठी कधीच धजावणार नाही; मुलांनाही जरूर शिकवा.

अन्न हा आपल्या जीवनाचा सर्वात अविभाज्य भाग आहे. हे जीवन अन्नाच्या जोरावरच चालत आहे. सजीवांमध्ये जीवन आणि चैतन्य अन्नामुळे आहे. अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देते, म्हणून ते घाईघाईत सेवन न करता शांतपणे सेवन केले पाहिजे आणि ज्याच्या कृपेने दोन वेळचा घास पोटात जात आहे त्या भगवंताचे आभार मानले पाहिजेत. ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या शेतकरी दादाचे आणि आपल्या ताटात सुग्रास भोजन वाढणाऱ्या सुगरणीचे स्मरण करून मगच अन्नाचे सेवन केले पाहिजे. तसे केले असता अन्न वाया न घालवण्याची जबाबदारी आपोआपच आपल्यावर येईल आणि रोजचेच जेवण प्रसादरूपी गोड वाटेल. 

सद्यस्थितीत आपले जीवन एवढे धावपळीचे झाले आहे की दोन घास जेवतानाही आपण शांत पणे जेवण करत नाही. हाताशी मोबाईल, समोर टीव्ही, फोनवर गप्पा मारत जेवतो. त्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही आणि विविध आजार उद्भवतात. मात्र, अन्न सेवनाबाबत अन्नशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. त्याचे पालन केले असता शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. 

अन्न कसे खावे आणि त्यापूर्वी आणि नंतर कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे याबद्दल धर्मग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. त्यात म्हटल्यानुसार -

अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः पक्ता देवो महेश्वरः.
एवं ज्ञात्वा तु यो भुड़्क्ते अन्नदोषो न लिप्यते

अर्थ: अन्न स्वतः ब्रह्म आहे आणि अन्नापासून बनलेला रस विष्णू आहे. शिजवलेले, परिपक्व अन्न हे महेशाचे रूप आहे. जे जाणून घेत कृतज्ञतेने अन्नसेवन करणाऱ्याला अन्नात दोष दिसत नाहीत आणि अन्नातून दोष निर्माणही होत नाहीत. म्हणून जेवणाआधी देवाचे नाव घेतले पाहिजे. 

आता हा श्लोक जाणून घेतल्यावर काय करायचे आहे, की जेंव्हा जेवणाचे ताट तुमच्या समोर येईल तेंव्हा सर्वात आधी हातात पाणी घ्या. ताटाभोवती पाणी फिरवा आणि तसे करताना हा श्लोक म्हणा. यांनतर गोविंद-गोविंद म्हणत अन्नसेवन करा. ऋषीमुनी तर दावा करतात, की श्लोकात दिलेल्या भावनेसह अन्नग्रहण करणाऱ्याला कधीही कोणतेही रोग होत नाहीत. यात चमत्काराचा भाग नसून सावधतेचा भाग आहे. आपण जेवणा आपल्या अन्नसेवनाबद्दल जागरूक होऊ, तेव्हा अतिरिक्त जेवणार नाही, जेवणात काही त्रुटी असतील तर त्या बाजूला करून अन्नसेवन करू. जेवढे लागेल तेवढेच अन्न घेऊ, त्यामुळे आपोआपच शरीराला दुष्परिणाम अनुभवावे लागणार नाहीत आणि शरीर, मन कायम प्रफुल्लित राहील. 

हे नियम देखील पाळा

लक्षात ठेवा की शक्यतो मांडी घालून जमिनीवर बसावे. ज्येष्ठांना खाली बसणे जमणार नसेल तर त्यांनी टेबल खुर्चीचा आधार घ्यावा. दक्षिणेकडे तोंड करून  अन्न खाऊ नये. जेवण करण्यापूर्वी ते देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून घ्यावे. त्यामुळे आपोआप आपल्या अन्नातही प्रसादत्त्व उतरते. अन्न खाताना चकरा मारू नये. दुपारचे जेवण सकाळी ११ ते दुपारी १.00 दरम्यान जेवावे आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवणे उचित ठरते. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर अन्न नेहमीच फायदेशीर ठरेल आणि शरीराचे पोषण वाढेल.

टॅग्स :foodअन्न