शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या तणाव युगात शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उपाय कोणते, जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 20, 2021 11:01 IST

मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

अवास्तव अपेक्षा आणि भरमसाठ महत्त्वाकांक्षा मनुष्याला असमाधानी बनवतात. हेच कारण अनेक प्रकारच्या व्याधींना आणि मानसिक अस्वस्थतेला खतपाणी घालते. महत्त्वाकांक्षा आणि इच्छा यांचा त्याग केला, तर चिंता आपोआप मिटेल. परंतु या दोन्ही गोष्टी इतक्या सहज शक्य नाहीत. म्हणून त्यांचा त्याग नाही, पण त्या आटोक्यात नक्कीच ठेवता येतील.

सुख वेगळे आणि सुविधा वेगळ्या! आपण दोन्ही शब्द एकत्र जोडतो. परंतु त्या दोहोंमधील फरक लक्षात घेतला पाहिजे. धनप्राप्ती ही सुविधा आहे, सुख नाही. ती तात्कालिक सोय आहे, कायमस्वरूपी सुखाचा मार्ग नाही. जी गोष्ट चिरंतन आनंद देऊ शकत नाही, त्याला सुख म्हणता येणार नाही. ती केवळ सुविधा असते.

चूका सगळ्यांकडून होतात. त्यापासून आपण किती काळ दूर पळणार? प्रयत्नांनी चूका कमी करता येतात, परंतु आयुष्य पूर्णपणे अचूक बनवता येणे कोणालाही शक्य नाही. मग त्या गोष्टींचा अट्टाहास का? आपण सगळेच जण परिपूर्ण आयुष्याचा ध्यास घेऊन जगत आहोत. परंतु कोणालाच हे माहित नाही,की आपले सुख नक्की कशात आहे? असे काय केले, की आपल्याला समाधान लाभेल? श्रीमंती हेच जर सुख असते, तर आज गर्भश्रीमंत लोक अमर असते. पण तसे होत नाही, त्यांनाही नानाविध व्याधींनी ग्रासले आहे. 

सुखाच्या अवास्तव कल्पनांमागे धावता धावता मन विविध प्रकारच्या काळजी, चिंता आणि भीतीने ग्रस्त होत चालले आहे. मन तणावाच्या ओझ्याने दबून गेलेले असते. आजाराचे मूळ मनोविकारात दडले आहे. भय, घृणा, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या हे षडरिपू आजाराला कारणीभूत आहेत. ते मनाची घुसमट करवतात आणि तीच घुसमट छोट्या मोठ्या आजारांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे रूप धारण करते. 

सतत चिंताग्रस्त असणारी व्यक्ती क्षयरोगाची शिकार होते. शिघ्रकोपी व्यक्ती हृदयविकाराची समस्या मागे लावून घेते. अन्नाचे अतिसेवन कोलेस्ट्रॉलला आमंत्रण देते, तर रागाच्या, नैराश्याच्या भरात केलेला अन्नत्याग थायरॉईड, कुपोषणाला कारणीभूत ठरते. याचाच अर्थ, मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

आजचे युग तणावयुग झाले आह़े जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. आपण आपला आनंद कुठे गमावून बसलो आहोत, याचे परीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात न देता स्वत:च्या खिशात ठेवण्याची कला आत्मसात केली, तर आजार कुठल्या कुठे पळून जातील!