शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला ...

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न घाबरता कुटुंबाची जबाबदारी पेलली. सध्या या महिलेने आपल्या शेतीत एक एकरात रेशीम शेती केली. यातून दरवर्षी पाच लाखांची कमाई होत आहे.

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे या अल्पशिक्षित महिलेची ही यशकथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. टालेवाडी येथील रहिवासी शिवराज फाटे (वय ४०) यांना नित्रुड शिवारातील टकारवाडी येथे चार एकर वडिलोपार्जीत जमीन वाटून आली. सुरुवातीला यांनी आपल्या शेतात कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, आदी पारंपरिक पिके घेतली. यामुळे शेतातील पिकापासून जास्त उत्पन्न मिळत नसे. शिवराज यांचे मेहुणे बीड येथील विवेक सोमवंशी यांच्या मित्राकडे रेशीम शेती असल्याने व त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अनेक वेळा शिवराज यांंना रेशीम शेती करण्यास सांगितले.

सन २०११ साली एक एकर शेतात रेशीम शेती करण्याचे ठरवल्यानंतर वडिलांनी यास विरोध केला. परंतु त्यांचे ऐकले नाही. त्यांचे न ऐकता रेशमाचे उत्पन्न घेत राहिले. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत असतानाच २०१५ साली वाहन अपघातात शिवराज यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला. आता शेतातील रेशीम शेतीचे काय करायचे? असा प्रश्न पडला. यानंतर दोन वर्षे ही शेती हिश्श्याने दिली; परंतु याद्वारे केवळ खर्चाची बरोबरी होऊ लागली. शिवराज यांची पत्नी छाया यांनी असे नुकसान झाले; तर आपले अवघड होईल. तुम्ही मला काय करायचे? ते सांगा, यापुढे शेती हिश्श्याने द्यायची नाही असे पतीला सांगितले. त्यानुसार त्या मागील तीन वर्षांपासून रेशीम शेती करीत आहेत. त्यांना त्यांचा १४ वर्षांचा मुलगा वेदान्त मदत करीत आहे. रेशीम शेतीत वर्षात पाच लाॅट घेत त्या आहेत. दहा ते बारा क्विंटल माल तयार होतो. त्यास भावही चांगला मिळत असल्याने वर्षाला यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एक एकर रेशीम शेतीतून मिळत आहे. त्यांनी एकही मजूर न लावता रेशीमसाठी पाला खुडण्यापासून तो टाकणे, उगवणही घरीच केली. त्यासाठीे सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे खर्चही वाचला. सध्या केवळ इतर खर्च पाच हजार रुपये येत आहे, असे छाया फाटे यांनी सांगितले.

----

रेशीम पिकासाठी उसाच्या मुकाबल्यात केवळ २५ टक्केच पाणी लागते. यापुढे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बंद करून रेशीम पीक पद्धतीकडे वळावे. रेशीम शेती महिलादेखील सहज करू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

- छाया फाटे, महिला शेतकरी. ....

===Photopath===

290521\0207img_20210527_105707_14.jpg

===Caption===

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे यांनी फुलविलेली रेशीम शेती.