शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला शक्य ते आष्टीला का जमत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ ...

आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ दिवसाला परीक्षा घेतली जाते. लातूरला शक्य आहे तर आष्टीच्या शिक्षकाला का जमत नाही? आष्टीची गुणवत्ता अजून वाढविण्यासाठी शिक्षकांनी आपला जास्तीचा वेळ द्यावा, असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.

तालुक्यातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २१ जुलै रोजी पार पडला. या कार्यक्रमात आ. सुरेश धस बोलत होते. यावेळी प्रफुल्ल सहस्रबुद्धे, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, आष्टी तालुका दूध संघाचे व्हा. चेअरमन आत्माराम फुंदे, आरती ससाणे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आ. धस यांनी १२० गुणवंतापैकी ७५ मुली असल्याने विशेष कौतुक केले. तालुक्यातील वसुंधरा शाळेतील १५ मुलींनी शंभर टक्के, जि.प. कन्या शाळेच्या १६ मुलींनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर गणेश विद्यालयातील नऊ विद्यार्थिनींनी आऊट ऑफ मार्क घेतले आहेत. या यशाचे गमक त्या शाळेतील शिक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांचे यश असल्याचे धस म्हणाले. गुणवत्तेचा आष्टी पॅटर्न करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारी घेतल्यास कितीही खर्च आल्यास ते पेलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यावेळी मनोज धस, भारत मुरकुटे, सुनील रेडेकर, मनोज सुरवसे, सुरेश पवार, बापू शिंदे, संपत शेळके, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.

एकशे वीस गुणवंतांचा सन्मान

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सुमारे एकशे वीस विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आ. सुरेश धस यांनी फेटा बांधून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

220721\22bed_10_22072021_14.jpg