शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील ...

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील यादव अंबादास दुसगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू

बीड : शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात असून, शहर ठाण्यांतर्गत वर्षभरात १,१६३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापोटी २ लाख ६५ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सीट बेल्ट, ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, कागदपत्रांची तपासणी यासह इतर वाहनांच्या नियमावलीचा समावेश आहे. शुक्रवारी पोलीस शिपाई ए.ए. सय्यद, भागवत घोडके यांनी वाहन तपासणी मोहीम सुरूच ठेवली.

जुन्या वादावरून मारहाण

परळी : शहरातील बरकतनगर येथील नाझिया हबीब पठाण यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शेख रफिक शेख रज्जाक, शेख तब्बो शेख रफिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोना. देशमुख तपास करीत आहेत.

डोंगर जाळण्याचे प्रकार

बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डोंगररागांवर आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे गवत चांगले येते, अशी गैरसमजूत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.

डासांची उत्पत्ती वाढली

वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

कापसाची वेचणी सुरूच

बीड : कापूस पिकाच्या दोन वेचण्यांमध्ये उत्पादन निघाले. दरम्यान, फरदड कापसाची वेचणी करण्यावरदेखील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बोंडअळीसारखा प्रकार वाढू नये म्हणून फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

क्रीडांगणाची दुरवस्था

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी काही ठिकाणची दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.