शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविडही घातक; रक्त गोठल्याने येतोय अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळेच अटॅक येतो आणि रुग्णाचा जीव जात आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात २०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले असून यात अनेकांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. परंतु याची वेगळी नोंद नसल्याने आकडा समोर आला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ५२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. पैकी ८६ हजार ७७३ जण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १५३६ एवढी आहे. कोरोनात तर धोका पोहचलाच परंतु कोरोनामुक्त होऊन घरी गेल्यावरही त्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी तयार केलेली आहे. यात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु पोस्ट काेविडनंतर किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना कोणते आजार झाले, किती लोक ठणठणीत झाले, याची वेगळी नोंद जिल्हा रुग्णालयात नसल्याचे सांगण्यात आले.

...

कोरोनामुक्तीनंतर काय त्रास होतो

कोरोनामुळे रक्त गोठून अटॅक येतो. तसेच पॅरालिसिस होऊ शकतो. पायातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ होण्याची शक्यता असते. जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, ॲस्परजिलॉसिससारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. रुग्ण डिप्रेशनमध्ये जातो. घरी गेल्यावर धाप लागणे, थकवा येणे, छाती दुखणे, दम लागणे अशी लक्षणे आणि त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना धोका असतो.

कोरोनामुक्त झाल्यावर लगेच कामाला लागू नये. आराम करावा. आहार पौष्टिक असावा. पाणी भरपूर प्यावे. यामुळे गोठलेले रक्त पातळ होते. अवजड काम करू नये. ब्रीदिंग एक्झरसाईज करावी. रक्त पातळ होण्यासाठी दिलेली औषधी वेळेवर घ्यावीत. थोडाही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांना दाखवावे, दुखणे अंगावर काढू नये.

---

कोरोनामुक्त झाल्यावरही गाफील राहू नये. कोरोनामुळे रक्त गोठते, यामुळे अटॅक येतो. यात अनेकांचा जीव जात आहे. पॅरालिसिस, पायांतील वाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीही लक्षणे जाणवली तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. अंगावर दुखणे काढणे घातक ठरू शकते. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना पोस्ट कोविडनंतरही अधिक त्रास होत असल्याचे दिसते.

-डॉ. विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय, बीड.

===Photopath===

200621\20_2_bed_14_20062021_14.jpeg

===Caption===

डॉ.विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रूग्णालय बीड