शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सावडलेली राख सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

ग्राउंड रिपोर्ट पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी ...

ग्राउंड रिपोर्ट

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी व दशक्रिया विधीसाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडील भागात राख सोडणे बंधनकारक करून दररोज विनापावती वरकमाई करण्याच्या नादात येथील ग्रामपंचायत येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना मात्र प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे.

या ठिकाणी वर्षानुवर्षापासून मृत व्यक्तीच्या विधीसाठी येणारे नागरिक हे दोन्ही नद्यांच्या पात्रात सावडलेली राख सोडत असत. परंतु मागील ५-६ वर्षात येथे येणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विविध फंडे अवलंबिले जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात ग्रामपंचायतीच्या संगनमताने गोदावरी नदी पात्रात झिरा खोदून तेथील पाणी दहा रूपयांना एक हंडा याप्रमाणे विकण्यात आला. यातून मोठ्या प्रमाणात कमाई करण्यात आली.

अलिकडचे प्रदूषण टाळण्यासाठी पलिकडचे फर्मान

मागील सहा महिन्यांपासून येथील गोदावरी पात्र दुथडी भरलेले आहे. याचा फायदा घेत येथील ग्रामपंचायतीने राखेमुळे नदीपात्रात घाण होऊ नये, असे कारण पुढे करत नदीपात्राच्या पलिकडे राख सोडण्याचे अघाेषित फर्मान काढले. या नदीपात्रात मोठे थर्माकोल आणून राख सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसविले जाते. दोरीला ओढत गोदावरीच्या पलिकडील बाजूला सोडून परत आणले जाते. यासाठी मनमानी रक्कम नागरिकांकडून उकळली जात आहे.

गोरखधंद्यातील कमाई कोणाची?

दुखात असलेल्या नागरिकांना लुटण्याच्या गोरखधंद्यातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. यापूर्वी एक हंड्याला दहा रूपये व आता गोदावरी नदीच्या पलीकडे जाऊन येण्यासाठी १५० ते २०० रूपये वसूल केले जातात. याची कोणालाही पावती दिली जात नाही. ही सर्व रक्कम कोणाच्या घशात जाते याची चौकशी होणे जरूरी आहे.

अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?

नदीपात्र पलिकडे असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अलिकडे येण्यासाठी व जाण्यासाठी याच चप्पूचा वापर करावा लागत असून यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. चप्पूवर लहान मुले , वृद्धांना घेऊन ५-६ लोकांना बसवून नेले जाते, येथील नागरिक भीतभीत सांगत होते. जर एखादे वेळी हा चप्पू पलटी होऊन मोठा अनर्थ झाला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विधीला येणाऱ्या नागरिकांना पडत असतो.

जलप्रदूषण टाळण्यासाठी सूचना

गोदावरी पात्रात तिसऱ्या दिवशी राख सोडण्यासाठी येणारे भाविक अलीकडेच राख सोडत असल्याने पाणी घाण होते म्हणून आम्ही राख गोदावरी पात्र पलिकडे सोडण्यास सांगतो. संतोष वाघमारे ,उपसरपंच ग्रामपंचायत मंजरथ.

===Photopath===

130421\13bed_2_13042021_14.jpg