शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:54 PM

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.

बीड - जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून दिलं जाईल, असे म्हणत पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. एक महिला जेव्हा राजकारणात येते, तेव्हा काही लोकांना बाटलीत बंद ठेवायची गरज असते, तर काहींना बाटलीतून बाहेर काढायची गरज असते. आता, एक महिला व बालकल्याणमंत्री म्हणून मला ते चांगल समजतंय, असेही पंकजा यांनी पुढे बोलताना म्हटले.  

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. तसेच जिल्हा रुग्णालयात महिला व शिशू विभागासाठी 100 खाटांची नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड नगर पालिकेसाठी 2 टप्प्यात 495 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

पंकजा यांनी आपल्या भाषणात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला, तसेच राष्ट्रवादीचे दोन गट पाडले. त्या राष्ट्रवादीत आणि या राष्ट्रवादीत. बीड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात विकास करायचा सोडून केवळ राजकारण करण्याच काम त्या राष्ट्रवादीनं केलं. बीड जिल्ह्यानं डझनभर आमदार दिले. पण, बीड जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही, साधी पंचायत समितीची इमारत उभी करण्यासाठीसुद्धा निधी मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 495 कोटी रुपयांचा निधी दिला. 

पूर्वीच्या काळात फक्त कागदावर रस्ते व्हायचे. स्वत:चे बगलबच्चे पोसण्याचं काम यापूर्वी झालंय. आता, सगळ ऑनलाईन आहे, टेंडर ऑनलाईन निघतात. त्यामुळे कुणालाही पोसण्याच काम आमच्याकडून होत नाही. केवळ, लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचं काम आम्ही करतो, असेही पंकजा यांनी म्हटले. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचं स्वप्न गेल्या 70 वर्षांपासून होतं. या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. या रेल्वेसाठी 2800 कोटी रुपये मंजूर झाले. 

बीड जिल्ह्यात महामार्गाच काम सुरू आहे. 6 हजार कोटींचे महामार्ग बीड जिल्ह्यात होत आहेत. तब्बल 950 किमीच्या लांबीचे हायवे बीड जिल्ह्यात होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा मोठी प्रगती करतोय, असेही पंकजा यांनी म्हटलं. दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळ असून पाऊस पडला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला, असे म्हणत पंकजा यांनी मुख्यमंत्र्याचेही कौतुक केले.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड