शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादकांचे बीडमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:04 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देअंडीपुंजचा तुटवडा : रेशीम उत्पादनात १९१४ शेतकऱ्यांचा सहभाग मात्र अडचणींत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड: आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.शेतकºयांना योग्यरित्या अंडीपुंजचा पुरवठा करावा व त्यानंतर नवीन शेतकºयांचा या योजनेमध्ये सहभागी करुन घ्यावे, वेळेवर अंडीपुंज शेतकºयांना देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा रेशीम कार्यालयासमोर रेशीम उत्पादक शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात राहुल चव्हाण, महेश बुद्धदेव,दादासाहेब पवार(बीड), लकुळ कदम (बीड), उद्धव घोलप(बीड), सुनिल नेहरकर (गेवराई), नवजीवन तिडके(परळी), किसनराव जाधव (अंबाजोगाई), संपत परळकर(केज), सुभाष जरे(आष्टी), चिंतामन दुटाळ, खोटे सर (माजलगांव), ज्ञानोबा मुंडे (परळी) यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी होते.रेशीम उत्पादक अडचणीतजिल्ह्यात रेशीम उत्पादनात १९१४ शेतकºयांचा सहभाग असून, जवळपास २ हजार ४२ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. वेळेवर अंडीपुंज मिळत नसल्यामुळे दोन ते तीन लॉट शेतकºयांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यानंतर वेळोवेळी मागणी करुन देखील अंडीपुंज मिळत नसल्यामुळे उत्पादन घेता येत नाही. तसेच पाणीटंचाईमुळे तुतीच्या झाडांवर देखील परिणाम होऊ लागला आहे.तसेच मागील दहा वर्षापासून रेशीम कोषाच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकºयांना योग्य मोबदला मिळत नाही याचा देखील शासनाने विचार करावा. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकºयांना देखील रेशीम कोषाला १०० रुपये प्रति किलो प्रोहोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच चॉकी सेंटरसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात यावे. ज्या शेतकºयांनी मागील वर्षी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाचा आवश्यकता आहे. मात्र, रेशीम अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांकडून योग्य मार्गदर्शन व वागणूक दिली जात नसल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांवर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.योग्य नियोजनानंतरच राबवावे ‘महारेशीम’जिल्ह्यातील २ हजार एकर क्षेत्रावर असलेल्या लागवडीसाठी वेळेवर अंडीपुंज पुरवठा केला जात नाही. मात्र, २० हजार हेक्टर क्षेत्रावर तुती लागवड करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महारेशीम अभियान राबवले जाणार आहे. मात्र नियोजन योग्यरित्या करुनच हेअभियान राबविल्यास सुरुवातीपासून उत्पादन घेणाºया शेतकºयांचे नुकसान होणार नाही.जिल्ह्यातील रेशीम उत्पादन२०४२ एकर क्षेत्रावर लागवड१९१४ शेतकºयांचा सहभाग६ लॉटमधून घेतले जाते उत्पादन४५ दिवसांनी एक लॉटसरासरी उत्पादन १ ते ३ लाख रु.दरवर्षी मजूरीपोटी मिळतात एकरी १ लाख १५ हजार रुपये

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीagitationआंदोलन