शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

रेशीम उत्पादकांचे बीडमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:04 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देअंडीपुंजचा तुटवडा : रेशीम उत्पादनात १९१४ शेतकऱ्यांचा सहभाग मात्र अडचणींत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड: आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.शेतकºयांना योग्यरित्या अंडीपुंजचा पुरवठा करावा व त्यानंतर नवीन शेतकºयांचा या योजनेमध्ये सहभागी करुन घ्यावे, वेळेवर अंडीपुंज शेतकºयांना देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा रेशीम कार्यालयासमोर रेशीम उत्पादक शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात राहुल चव्हाण, महेश बुद्धदेव,दादासाहेब पवार(बीड), लकुळ कदम (बीड), उद्धव घोलप(बीड), सुनिल नेहरकर (गेवराई), नवजीवन तिडके(परळी), किसनराव जाधव (अंबाजोगाई), संपत परळकर(केज), सुभाष जरे(आष्टी), चिंतामन दुटाळ, खोटे सर (माजलगांव), ज्ञानोबा मुंडे (परळी) यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी होते.रेशीम उत्पादक अडचणीतजिल्ह्यात रेशीम उत्पादनात १९१४ शेतकºयांचा सहभाग असून, जवळपास २ हजार ४२ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. वेळेवर अंडीपुंज मिळत नसल्यामुळे दोन ते तीन लॉट शेतकºयांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यानंतर वेळोवेळी मागणी करुन देखील अंडीपुंज मिळत नसल्यामुळे उत्पादन घेता येत नाही. तसेच पाणीटंचाईमुळे तुतीच्या झाडांवर देखील परिणाम होऊ लागला आहे.तसेच मागील दहा वर्षापासून रेशीम कोषाच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकºयांना योग्य मोबदला मिळत नाही याचा देखील शासनाने विचार करावा. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकºयांना देखील रेशीम कोषाला १०० रुपये प्रति किलो प्रोहोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच चॉकी सेंटरसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात यावे. ज्या शेतकºयांनी मागील वर्षी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाचा आवश्यकता आहे. मात्र, रेशीम अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांकडून योग्य मार्गदर्शन व वागणूक दिली जात नसल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांवर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.योग्य नियोजनानंतरच राबवावे ‘महारेशीम’जिल्ह्यातील २ हजार एकर क्षेत्रावर असलेल्या लागवडीसाठी वेळेवर अंडीपुंज पुरवठा केला जात नाही. मात्र, २० हजार हेक्टर क्षेत्रावर तुती लागवड करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महारेशीम अभियान राबवले जाणार आहे. मात्र नियोजन योग्यरित्या करुनच हेअभियान राबविल्यास सुरुवातीपासून उत्पादन घेणाºया शेतकºयांचे नुकसान होणार नाही.जिल्ह्यातील रेशीम उत्पादन२०४२ एकर क्षेत्रावर लागवड१९१४ शेतकºयांचा सहभाग६ लॉटमधून घेतले जाते उत्पादन४५ दिवसांनी एक लॉटसरासरी उत्पादन १ ते ३ लाख रु.दरवर्षी मजूरीपोटी मिळतात एकरी १ लाख १५ हजार रुपये

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीagitationआंदोलन