शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श भारत निर्मितीसाठी कबीरवाणी महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन ...

बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन व्याख्यात्या अर्चना सानप यांनी केले. येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून औषधनिर्माण अधिकारी प्रियंका जाधव उपस्थित होत्या.

अर्चना सानप म्हणाल्या, संत कबीर यांनी संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी प्रयत्न केले. कबीरवाणीमध्ये बरेचसे प्रसंग आजच्या काळातही अनुकूल आहेत. संत कबीर एक महान क्रांती असलेले विचारवंत म्हणून नेहमी लक्षात राहतात. सध्या जगात फक्त भारतातच नाही तर विविध देशांमध्ये त्यांच्या रचनांवर वेगवेगळ्या प्रकारे शोध सुरू आहेत. आज समाजात जी अशांतता, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी संत कबीर यांचे आदर्श एक अनमोल ठेवा आहे. त्यादृष्टीने कबीर यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रत्येक सामान्य व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. संत कबीर यांचा जन्म अशा काळात झाला की, त्यावेळी सर्व जग हे अशांतीने ग्रासले होते. त्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संत कबीर यांचा प्रामुख्याने सामाजिक न्यायावर आधारित समाजाच्या निर्मितीवर भर दिला व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला. याची आजच्या काळातही आवश्यकता आहे, असे मत सानप यांनी व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पंडित यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्रल्हाद वाघमारे, पांडुरंग पंडित, दिलीप वाघमारे, किशोर पंडित, कुणाल जाधव, अमोल पंडित, आदी उपस्थित होते.