शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:15 AM

जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

ठळक मुद्देबीड लोकसभा निवडणूक : २०१४ ला २८ गुन्हे, यावेळेस मात्र किरकोळ २ घटना

बीड : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. मागील महिनाभरपासून पोलिसांनी केलेले नियोजन आणि उपद्रवींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८ गुन्हे दाखल झाले होते. यावेळेस मात्र किरकोळ २ घटना घडल्या आहेत. यावरून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत व शांततेत पार पडल्याचे स्पष्ट होते. जाणकारांच्या माहितीनुसार असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येते.बीड जिल्ह्यातील राजकारणाची राज्यभर चर्चा होते. यावेळीही ही चर्चा कायम होती. राजकीय चर्चा होत असली तरी प्रशासनाकडूनही ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक प्रकार वगळता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे दोन आणि इतर तीन असे पाच गुन्हे दाखल झाले. मात्र, मतदानाच्या दिवशी गुन्हा घडू न देता दप्तर कोरे ठेवण्यात पोलिसांना यश आले. अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत मद्यपीने घातलेला गोंधळ आणि नेकनूर ठाणे हद्दीत झालेली शिवीगाळ हे अपवादात्मक किरकोळ प्रकार सोडले तर मतदान शांततेत झाले.दरम्यान, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली. सर्व उपद्रवी, गुन्हेगारांची यादी मागविली. त्यांच्या गुन्ह्यांनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीए, हद्दपारीसारख्या कारवाया केल्या. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह अपर अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रमुख यांनी तत्पर केलेला बंदोबस्त, यामुळेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.पोलिसांचे नियोजन : पहिली फेरी फत्ते; दुसरी फेरी २३ मे रोजीबीड पोलिसांच्या माहितीनुसार ८ एप्रिलपर्यंत जुगार, दारूसह इतर गुन्हे करणाऱ्या ११ टोळ्यांमधील ५६ गुन्हेगारांवर मपोका ५५ व ५६ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाºया ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी केली.दारूबंदी व जुगार अड्डयांवरही धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदीच्या ५५१ केसेस करून ४६ हजार ४०९ लिटर म्हणजेच १६ लाख ५६ हजार ५७० रूपयांची दारू जप्त केली आहे.७० जुगार अड्डयांवर धाडी टाकून ११२६ आरोपी ताब्यात घेत त्यांना न्यायालसमोर हजर करण्यात आले आहे. ११२६ आरोपींना अजामीनपत्र वॉरन्टही बजावण्यात आले आहेत.पाहिजे/फरारी असलेल्या १०४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ३२१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.याबाबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला सोबत घेऊन ६ ठिकाणी तर पोलिसांच्या विविध तुकड्या घेऊन ४ अशा जिल्ह्यात १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले आहे. तसेच दंगल नियंत्रणाची रंगीत तालीमही करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliceपोलिसVotingमतदान