शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्त्याचे देयक अदा करू नये : वसंत मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ...

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ऑर्डर देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, महामार्ग दोन्ही बाजूने खोदल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच कामाचा निकृष्ट दर्जा व विहीत मुदतीत काम न झाल्यामुळे देयके अदा करू नयेत अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार व राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे निविदा रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या कामाचे सर्व पुरावे संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यात १५३ कोटी वरून १३४ कोटी रुपयांचे काम १०० कोटी रुपये कमी दराने औरंगाबाद येथील एका खसगी कंपनीला मिळाले. जानेवारी २०२० ला कामाची सुरुवात झाली होती. मात्र, धिम्या गतीने काम सुरू असून, आतापर्यंत अनेक अपघात महामार्गावर झाले आहेत. त्यात मृत्यूदेखील झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांनी कंत्राटदारावर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची तंबीदेखील दिली होती. तसेच तक्रारीद्वारे निविदेच्या तरतुदीनुसार महामार्ग कामाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

तक्रारीवरून दक्षता पथकामार्फत चौकशी करून सूचनाही देण्यात आल्या. परंतु, कामाच्या गुणवत्तेचा दर्जा खराब असून, निकृष्ट काम चालू आहे. कामाचा दर्जा सुधारणा होत नसल्यामुळे परळी अंबाजोगाई ५४८ ब रस्त्याचे कामाची देयके अदा करू नयेत अशी मागणी मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यावर १ जानेवारी २०२१ ला शासनाकडून संपूर्ण कामाच्या दर्जासंदर्भात चौकशी होऊन अहवाल सादर होईपर्यंत देयके अदा करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तक्रारीमुळे जनतेच्या पैसा वाचला

नागरिकांनी भरलेल्या करातून विकासकामे केली जातात, महामार्गाच्या कामाची तक्रार दिल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या, या कामात जवळास ५० कोटी रुपये शासनाचे म्हणजेच जनतेचा पैसा वाचला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.