शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मालदार ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामसेवकात ‘लिलाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही ग्रामसेवकांनी पैसे मोजून मालदार ग्रामपंचायतीत नेमणुका करून घेतल्याची माहिती समजली आहे. यासाठी ग्रामसेवकात लिलाव देखील झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामसेवकात ऐकायला मिळत आहे.

जो ग्रामसेवक जास्त पैसे मोजेल त्यास मोठी ग्रामपंचायत असे फर्मानच काढण्यात आले होते, अशा आशयाच्या तक्रारी ग्रामसेवकांनी केल्या आहेत. यामुळे मागील आठवड्यापासून अनेक ग्रामपंचायतींना ग्रामसेवक पोहोचले नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील दहा ग्रामसेवकांच्या बदल्या इतर तालुक्यात झाल्या होत्या. त्यांच्या जागी इतर तालुक्यातून दहा जण या ठिकाणी रुजू झाले. ते रुजू होताना त्यांना कोणती ग्रामपंचायत द्यायची याची खलबते सुरू झाली. ग्रामसेवकांना पसंतीची ग्रामपंचायत हवी असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले. नवीन ग्रामसेवकांना आर्थिक व्यवहारातून पाहिजे त्या ग्रामपंचायती दिल्या. त्या गावातील ग्रामसेवकांच्या देखील इतरत्र बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे जुन्या ग्रामसेवकांच्या काहीच तक्रारी नसताना त्यांच्या अचानक बदल्या झाल्याने सरपंच व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत नव्या व जुन्या ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मालदार ग्रामपंचायत पाहिजे असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले होते. जो जास्त बोली लावेल त्यांना मोठी ग्रामपंचायत, असे ठरवण्यात आले. हा सर्व प्रकार पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक करीत असल्याचेही ग्रामसेवकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व बदल्यांमुळे माजलगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. दरम्यान, तालुक्यातील घळाटवाडी, केसापुरी, फुलेपिंपळगाव, भाटवडगाव या मालदार गावांसाठी ग्रामसेवकात आता रस्सीखेच सुरू झाली आहे.

----------

बदलीमागे कोण?

ग्रामसेवकांच्या बदल्या केल्यानंतर अनेक सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समितीत जाऊन वरिष्ठ सहाय्यकांकडे बदल्यांबाबत विचारणा केली. आमदार साहेबांनी सांगीतल्यावरून आपण बदल्या केल्या असल्याचे ते सांगत होते. असे येथे चौकशी केलेल्या सरपंच, ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसेवकांच्या बदल्यांमागे केवळ वरिष्ठ सहाय्यकाच नसून त्यांना येथील वरिष्ठ अधिका-यांचे आशीर्वाद असल्याचीही चर्चा होती.

------

नवीन आलेल्या ग्रामसेवकांना गावांची माहिती नसल्यामुळे त्यांना इतर ग्रामसेवकांच्या जागी देण्यात आले आहे. यामुळे या बदल्यात आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच उदभवत नाही.

-ए.एम.सिध्दीकी, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, माजलगाव.