शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जुन्या कारची विल्हेवाट लावल्यानंतरच नवी कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 5:54 AM

दिल्लीत वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीची शिफारस

नवी दिल्ली : जुन्या व निकामी झालेल्या चारचाकीची विल्हेवाट लावल्याशिवाय नव्या गाडीची नोंदणी करता येणार नाही, असा नियम करण्याची शिफारस दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापनाच्या संदर्भात संसदीय समितीने केली आहे. या शिफारशीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरीही अद्याप यातील निकष पुढे आलेले नाही.

दिल्लीतील वाहतूक कोंडी हा सरकारपुढील एक मोठा प्रश्न आहे. दिल्ली सरकार व केंद्र सरकारही त्यावर सातत्याने उपाययोजना करीत आले. पण, तरीही हा प्रश्न सुटत नाही. त्यावर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या नेतृत्वातील ३१ सदस्यांच्या संसदीय समितीने काही शिफारसी केल्या आहेत.

‘दिल्लीतील वाहतूक व्यवस्था बदलण्याचे व्यवस्थापन’ या शिर्षकाखाली हा अहवाल अलीकडेच राज्यसभेत सादर करण्यात आला. त्यामुळे कोंडी दूर करण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा सरकारपुढे उभे झाले. प्रदूषणावरील उपाययोजना म्हणून दिल्ली सरकारने ‘सम-विषम’ लागू केले होते. त्यामुळे काही प्रमामात दिल्लीतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर झाली होती. मात्र, वाहतूक कोंडीवरील हा कायमस्वरुपी उपाय नसल्यामुळे नवे पर्याय शोधले जात आहेत. समितीने चारचाकीचा विमा वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी निश्चित केलेल्या दंडाशी जोडण्याची शिफारसही केली आहे. जे नियमित वाहतूक नियम मोडतात त्यांच्याकडून अधिक जास्त प्रिमीयम वसूल करावा, असे समितीने म्हटले आहे.

या भागांमध्ये सर्वाधिक समस्या

दिल्लीतील कनॉट प्लेस, लाजपतनगर, नेहरू प्लेस, भिकाजी प्लेस, करोल बाग, विकास मार्ग, कमला नगर मार्केट आणि कृष्णानगर मार्केट येथे वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या आहे, असे संसदीय समितीने म्हटले आहे.

पार्किंगसाठी जागा असेल तरच नोंदणी

यामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा असल्याचे सिद्ध केले तरच नव्या चारचाकीची नोंदणी करण्याची परवानगी असेल, अशी अट घालण्याची शिफारसही करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये दररोज सरासरी १४०० वाहनांची नोंदणी होते. गेल्या चार महिन्यांमध्ये वाहन उद्योगात मंदी आल्यामुळे काही प्रमाणात यात घट झाली होती. पण, महागाईच्या झळा असतानाही पुन्हा एकदा वाहन खरेदीत वाढ झाली.

टॅग्स :carकारParkingपार्किंगpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी