शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जैवविधता समित्यांची अंमलबजावणी हाेते तरी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता ...

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे गावोगावी समित्या गठित केलेल्या समित्यांची अंमलबजावणी होते की नाही असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने ऑगस्ट २०१८ मध्ये दिलेल्या आदेशात जैवविविधता मंडळाद्वारे व जैविक विविधता कायदा २००२ ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर यशस्वीपणे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांवर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करून समितीमार्फत लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतीमध्ये या जैवविविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जैवविविधता मंडळ नागपूर व विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडे ग्रामपंचायत स्तरावरील नोंदवह्या पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या सादर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींनी पंचायत समिती व जिल्हा परिषद असे मिळून या नोंदवह्या पाठवण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत पूर्ण केल्याचे झेडपी पंचायत विभागाकडून सांगण्यात आले आहे. यानुसार विविध टप्प्यातील गावोगावच्या जैवविविधता नोंदी करून त्याची माहिती शासन व वनविभागास जैवविविधता मंडळ सादर करण्यात आली आहे. यानंतर मात्र जैवविधता समित्यांमार्फत करावयाच्या अंमलबजावणी प्रक्रिया अजूनही सुरू झाली नसल्याचे वास्तव ग्रामपंचायत स्तरावर दिसून येत आहे.

कोट

जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी विविध टप्प्यांतील नोंदी करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ स्तरावर सादर केली आहे. याबाबत पुढील सूचना आल्यानंतर अंमलबजावणीची कारवाई केली जाईल.

- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

कोट

सन २०१८ मध्ये शासन व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर जैवविधता समित्या गठित केल्या. यासंदर्भात प्रशिक्षण घेतले. आराखडे सादर केले. परंतु, त्यानंतर अंमलबजावणी बाबत अद्याप कुठल्याची सूचना आलेल्या नाहीत.

- आशिष भागवत,

जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन