शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला, मात्र मोठे प्रकल्प तहानलेलेच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:16 IST

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

- संदीप मानकरअमरावती - पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या ५ आॅगस्ट सकाळ ७ वाजेपर्यंतच्या  नोंदीनुसार धरणांत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊन २३.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ४२.०१ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांत सहा टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ होऊन आता १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  गत आठवड्यापासून रिमझिम तथा मध्यम व काही ठिकाणी दमदार कोसळत असलेल्या पावसांमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. हजारो शेतक-यांनी दुबार पेरणी केली आहे. नेमकी किती शेतकºयांनी दुबार पेरणी केली, या संदर्भाची माहिती कृषी विभाग घेत असल्याची माहिती आहे. २९ जुलै रोजी मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत १५.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यानंतर झालेल्या सार्वत्रिक दमदार पावसामुळे सद्यस्थितीत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे १०.३५ टक्क्यांनी सरासरी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा हा २०.३६ टक्क्यांनी वाढला, तर लघु प्रकल्पांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नसली तरी ६.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. आठवडाभरापूर्वी मोठ्या नऊ प्रकल्पांत १५.३८ टक्के पाणीसाठा होता, तर २४ मध्यम प्रकल्पांत २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ४६९ लघु प्रकल्पांत १०.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्याकारणाने नागरिकांना पाणीसाठा वाढले की नाही, यासंदर्भाची चिंता लागली होती.यंदा मध्यम प्रकल्पांत काही प्रमाणात चांगला पाणीसाठा साचला असून, अद्यापही १५ मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. आठ प्रकल्पांत मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने अनेक तालुक्यांची यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत सद्यस्थितीत १९.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३२.७७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १०.९२ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५६.१० टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ४८.५९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ३६.३० टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या नऊ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्तसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ३३२.९६ दलघमी आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भ