शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला, मात्र मोठे प्रकल्प तहानलेलेच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:16 IST

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

- संदीप मानकरअमरावती - पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या ५ आॅगस्ट सकाळ ७ वाजेपर्यंतच्या  नोंदीनुसार धरणांत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊन २३.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ४२.०१ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांत सहा टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ होऊन आता १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  गत आठवड्यापासून रिमझिम तथा मध्यम व काही ठिकाणी दमदार कोसळत असलेल्या पावसांमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. हजारो शेतक-यांनी दुबार पेरणी केली आहे. नेमकी किती शेतकºयांनी दुबार पेरणी केली, या संदर्भाची माहिती कृषी विभाग घेत असल्याची माहिती आहे. २९ जुलै रोजी मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत १५.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यानंतर झालेल्या सार्वत्रिक दमदार पावसामुळे सद्यस्थितीत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे १०.३५ टक्क्यांनी सरासरी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा हा २०.३६ टक्क्यांनी वाढला, तर लघु प्रकल्पांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नसली तरी ६.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. आठवडाभरापूर्वी मोठ्या नऊ प्रकल्पांत १५.३८ टक्के पाणीसाठा होता, तर २४ मध्यम प्रकल्पांत २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ४६९ लघु प्रकल्पांत १०.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्याकारणाने नागरिकांना पाणीसाठा वाढले की नाही, यासंदर्भाची चिंता लागली होती.यंदा मध्यम प्रकल्पांत काही प्रमाणात चांगला पाणीसाठा साचला असून, अद्यापही १५ मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. आठ प्रकल्पांत मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने अनेक तालुक्यांची यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत सद्यस्थितीत १९.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३२.७७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १०.९२ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५६.१० टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ४८.५९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ३६.३० टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या नऊ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्तसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ३३२.९६ दलघमी आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भ