शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर गावात अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

फोटो पी ०१ शिरपूर धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी ...

फोटो पी ०१ शिरपूर

धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शिरपूर गावातील पंधरा ते वीस आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान उडाल्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करणे सुरू केले आहे

धारणी तालुक्यात मागील दोन दिवसापासून अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराचा अवकाळी पडत होता. सोमवारला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान याच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या पावसात अचानक विजेच्या कडकडाट व वादळी वारा सुरू झाला. त्याचा फटका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावाला बसल्याने गावातील २० आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे अचानक उडाली. त्यामुळे आदिवासी बांधवांचे रात्रीच संसार उघड्यावर पडले. त्या भरपावसात आदिवासी बांधवांनी घरातील अन्नधान्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने घरातील पूर्ण अन्नधान्य ओले झाले. त्यासह घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार अतुल पाटोळे, आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन आदिवासी बांधवांच्या नुकसानाची पाहणी केली व तात्काळ महसूल ग्रामपंचायत प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरपूर गावात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू झाले असून, नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांकडे सानुग्रह अनुदानाची मागणी

शिरपूर गावातील आदिवासी बांधवांना तहसील प्रशासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा निधी तहसील प्रशासनाकडे नसल्याने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सानुग्रह अनुदानाच्या रकमेची मागणी केली आहे. ते अनुदान आल्यांनातर तात्काळ प्रत्येकी सहा हजार रुपये आदिवासी बांधवांना देण्यात येणार आहे.