शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा जंगलातील ‘त्या’ आश्रम परिसरात होणार पर्यटनस्थळ

By admin | Updated: October 12, 2015 00:22 IST

नजीकच्या पोहरा जंगलात काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या ‘ओशो रजनीश आश्रम’ परिसराला निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

गणेश वासनिक अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या ‘ओशो रजनीश आश्रम’ परिसराला निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.पोहरा वनवर्तुळांतर्गत इंदला बीट सर्वे.क्र.३५ मध्ये काही वर्षांपूर्वी शेतीचे काम करण्याच्या नावाखाली ‘ओशो रजनीश’ आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निसर्गाच्या सान्निध्यातील या आश्रमात कालांतराने गैरकृत्ये होत असल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी धाडसत्र राबवून येथे वारंवार कारवाया केल्यात. काही वर्षांनी हा आश्रम पोलिसांनी बंद पाडला. आश्रमाची इमारत कालांतराने ओस पडली. वनविभागाच्या उत्पन्नात पडणार भरअमरावती : यापैकी एका इमारतीचे बांधकाम वनविभागाच्या जमिनीवर असल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे ही इमारत वनविभागाने ताब्यात घेतली आहे. मोहित करणाऱ्या निसर्गदृश्यांची रेलचेल पोहरा जंगलात असल्यामुळे वनविभागाने तलाव असलेला हा परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंगर पायथ्याशी पसरलेली हिरवळ, तलाव, वन्यपशुंचा वावर या विविध बाबी पोषक असल्यामुळे हा उपक्रम वनविभागाच्या उत्पन्नात भर पाडणारा ठरणार आहे. दरम्यान या परिसरात ये-जा करण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. निसर्गाच्या कुशीत असलेला हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याने ही बाब पर्यटकांना निश्चितच सुखावणारी आहे.पोलिसांमुळे गैरप्रकारांना आळापोहरा जंगलात निसर्गाच्या कुशीत असलेल्या यापूर्वीच्या ‘ओशो आश्रमा’त काही वर्षांपूर्वी चालत असलेल्या वाममार्गाला पोलीस कारवाईनेच आळा घातला आहे. सतत पोलिसांची गस्त, अटकसत्र राबवून येथे ये-जा करण्यावर कायदेशिर कारवायांमुळे लगाम लावण्यात आला, हे विशेष.दोन किमी. रस्ता निर्मितीत अटी, शर्थीचे बंधनराखीव वनक्षेत्र असलेल्या पोहरा जंगलातील आश्रमस्थळ परिसरात सन २०१४ मध्ये अटी, शर्थींच्या अधिन राहून दोन किमी. रस्ता निर्मितीला मंजुरी दिली होती. वन्यपशुंचा वावर असताना या रस्त्यामुळे त्रास होणार नाही, ही काळजी घेण्यात आली होती. चहुबाजुने वनजमीन असताना मध्यंतरी शेती असल्याने वहिवाटीच्या रस्ता निर्मितीला त्यावेळी मान्यता दिल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.