शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यात टॅंकरवारी सुरूच; ३,२९१ गाववाडे तहानलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 15:32 IST

मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अमरावती : मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जूनच्या तिस-या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती पालटण्याचे संकेत आहेत. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.गतवर्षी १२ जूनला १,७९८ गावे आणि ४,२८१ गावांना १,६६६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा टँकरची संख्या वाढली असली तरी टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे.कोकणातील पाच जिल्ह्यांतील २२७ गावे व ६३० वाड्यांमध्ये १०५ टँकरने, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ३१६ गावे व ३५८ वाड्यांमध्ये २६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ४३० गाववाड्यांमध्ये ७५ टँकर, औरंगाबाद विभागातील ९५३ गाववाड्यांमध्ये सर्वाधिक ९६२ टँकरने, तर नागपूर विभागातील ४१ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमरावती विभागातील ३३६ गावांमध्ये ३३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. अर्थात राज्यातील १,७८५ गावे व १,५०६ वाड्यांमध्ये १९९ शासकीय टँकर व १,५७८ खासगी अशा १७७७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही आकडेवारी ११ जूनपर्यंतची आहे.

१९.०२ टक्के उपयुक्त जलसाठाराज्यातील ३,२४६ जलाशयांमध्ये १२ जूनअखेर केवळ १९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील एकूण ४४३ प्रकल्पांमध्ये १६.३४, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये ४०.३४, नागपूरमधील ३८५ प्रकल्पांमध्ये ११.३३, नाशिकमधील ५६१ प्रकल्पांमध्ये १९.६६, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये १७.२९ टक्के, तर मराठवाड्यातील ९५७ प्रकल्पांमध्ये केवळ १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेAmravatiअमरावतीMarathwadaमराठवाडाnagpurनागपूरNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल